शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

मोदींना नेहमीच खलनायक ठरवणे अयोग्य; काँग्रेस नेत्यांचं मतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 15:19 IST

मोदींनी अशी कामं केली जी मागील काळात झाली नाही. त्यामुळे जनता त्यांचं कौतुक करत आहे. हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही, तोपर्यंत या व्यक्तीविरुद्ध लढा देणे कठीण आहे.

नवी दिल्ली - एकापाठोपाठ दोन काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खलनायक ठरवून दाखवणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी या संदर्भात मत मांडून काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेहमीच खलनायक ठरवून जगासमोर दाखवणे चुकीचे आहे. विरोधक त्यांना अयोग्य ठरवून त्यांची मदत करत असल्याचे मत अभिषेक मनू सिंघवी यांनी व्यक्त केले. याआधी माजी केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे महत्त्व कमी करणे योग्य नाही. यातून काहीही साध्य होणार नसल्याचे म्हटले होते.

सिंघवी यांनी रमेश यांच्या ट्विटचा हवाला देत म्हटले की, मी नेहमीच सांगत आलोय मोदींना खलनायक ठरविणे योग्य नाही. केवळ ते देशाचे पंतप्रधान आहे म्हणून नव्हे तर असं केल्याने मोदींना मदत होते. कामाचे मुल्यांकन व्यक्त केंद्रीत नव्हे तर मुद्दांवर असावे. मोदींची उज्ज्वला योजना चांगली असल्याचे यावेळी सिंघवी यांनी सांगितले.

याआधी जयराम रमेश म्हणाले होते की, मोदींनी २०१४ ते २०१७ या कालावधीत केलेल्या कामांमुळे ते पुन्हा सत्तेत परतले. मोदी सरकार पूर्णपणे नकारात्मक नक्कीच नाही, असं त्यांनी एका कार्यक्रमात म्हटले. मोदी सर्वसामान्यांना जोडणाऱ्या भाषेत बोलतात. मोदींनी अशी कामं केली जी मागील काळात झाली नाही. त्यामुळे जनता त्यांचं कौतुक करत आहे. हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही, तोपर्यंत या व्यक्तीविरुद्ध लढा देणे कठीण आहे. तसेच कायम त्यांना खलनायक ठरवल्याने त्यांचा मुकाबला करणे अशक्य असल्याचे रमेश यांनी नमूद केले होते.