शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

मोदींना नेहमीच खलनायक ठरवणे अयोग्य; काँग्रेस नेत्यांचं मतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 15:19 IST

मोदींनी अशी कामं केली जी मागील काळात झाली नाही. त्यामुळे जनता त्यांचं कौतुक करत आहे. हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही, तोपर्यंत या व्यक्तीविरुद्ध लढा देणे कठीण आहे.

नवी दिल्ली - एकापाठोपाठ दोन काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खलनायक ठरवून दाखवणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी या संदर्भात मत मांडून काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेहमीच खलनायक ठरवून जगासमोर दाखवणे चुकीचे आहे. विरोधक त्यांना अयोग्य ठरवून त्यांची मदत करत असल्याचे मत अभिषेक मनू सिंघवी यांनी व्यक्त केले. याआधी माजी केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे महत्त्व कमी करणे योग्य नाही. यातून काहीही साध्य होणार नसल्याचे म्हटले होते.

सिंघवी यांनी रमेश यांच्या ट्विटचा हवाला देत म्हटले की, मी नेहमीच सांगत आलोय मोदींना खलनायक ठरविणे योग्य नाही. केवळ ते देशाचे पंतप्रधान आहे म्हणून नव्हे तर असं केल्याने मोदींना मदत होते. कामाचे मुल्यांकन व्यक्त केंद्रीत नव्हे तर मुद्दांवर असावे. मोदींची उज्ज्वला योजना चांगली असल्याचे यावेळी सिंघवी यांनी सांगितले.

याआधी जयराम रमेश म्हणाले होते की, मोदींनी २०१४ ते २०१७ या कालावधीत केलेल्या कामांमुळे ते पुन्हा सत्तेत परतले. मोदी सरकार पूर्णपणे नकारात्मक नक्कीच नाही, असं त्यांनी एका कार्यक्रमात म्हटले. मोदी सर्वसामान्यांना जोडणाऱ्या भाषेत बोलतात. मोदींनी अशी कामं केली जी मागील काळात झाली नाही. त्यामुळे जनता त्यांचं कौतुक करत आहे. हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही, तोपर्यंत या व्यक्तीविरुद्ध लढा देणे कठीण आहे. तसेच कायम त्यांना खलनायक ठरवल्याने त्यांचा मुकाबला करणे अशक्य असल्याचे रमेश यांनी नमूद केले होते.