शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

'राहुल गांधींना लाँच करण्यासाठी काँग्रेसकडून गुजरातमध्ये हिंसाचार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 21:20 IST

गुजरातमधून उत्तर भारतीय पलायन करत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं. गुजरातमधील परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरलं असून, देशातील व्यवस्था आणि अर्थव्यवस्था कोसळल्याची टीका राहुल गांधींनी केली होती.

नवी दिल्ली- गुजरातमधून उत्तर भारतीय पलायन करत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं. गुजरातमधील परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरलं असून, देशातील व्यवस्था आणि अर्थव्यवस्था कोसळल्याची टीका राहुल गांधींनी केली होती. काँग्रेसच्या याच आरोपाला भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस देशाला विभाजित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा पलटवार भाजपानं केला आहे. तसेच गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर झालेल्या हल्ल्यात काँग्रेसचा हात आहे. राहुल गांधींना लाँच करण्यासाठी काँग्रेसनं उत्तर भारतीयांवर हल्ले चढवले, असा आरोप भाजपानं केला आहे.काँग्रेस पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी लोकांना भडकावण्याचं काम केलं आहे. गुजरातमध्ये उफाळून आलेल्या हिंसाचारामागे काँग्रेसचा हात आहे. तसेच या प्रकाराला अल्पेश ठाकोर कारणीभूत आहे. काँग्रेस पक्ष शहरातल्या नक्षल्यांना आर्थिक मदत करत असल्याचा गंभीर आरोपही भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. मंदसोरमध्ये काँग्रेस आमदारानं लोकांना भडकावण्यासह परिसरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व प्रकाराच्या मागे राहुल गांधींना लाँच करण्याचा उद्देश आहे.काँग्रेसच्या तीन 'सी'चा भांडाफोड झाला आहे. ज्यात अफरातफरी, षड्यंत्र, धोका या तीन गोष्टींचा समावेश आहे. गुजरातमधील उत्तर भारतीयांवरील हल्ल्यानंतर 20 हजारांहून जास्त प्रवासी आपापल्या राज्यांत परतले आहेत. परंतु राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी सुरक्षा प्रदान करणार असल्याचं सांगत त्यांना परत गुजरातमध्ये येण्याचं आवाहन केलं आहे. 

काय आहे प्रकरण ?गुजरातच्या साबरकांठा येथे 28 सप्टेंबर रोजी 14 महिन्यांच्या चिमुकलीवर एका बिहारी कामगाराने बलात्कार केला होता. त्यानंतर नेहमीच शांत, संयमी असलेल्या गुजरातींचाही राग अनावर झाला. त्यामुळे युपी-बिहारी नागरिकांना गुजरात सोडून देण्याचा इशारा देण्यात आला. विशेष म्हणजे गुजरातमधील 11 जिल्ह्यांत ही मोहीम तीव्र झाली असून अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत 50 हजार उत्तर भारतीयांनी गुजरात सोडल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Sambit Patraसंबित पात्राBJPभाजपा