शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
3
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
4
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
5
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
6
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
7
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
8
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
9
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
10
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
11
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
12
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
13
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
14
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
15
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
16
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
17
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
18
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
19
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
20
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस

“इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, २ दिवसांत PM पदाचा निर्णय घेणार”; काँग्रेस नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 10:01 AM

Congress Jairam Ramesh News: २००४ लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाही निकाल येतील. दोन दिवसांत पंतप्रधान कोण असेल, याची घोषणा केली जाईल, असे काँग्रेसने म्हटले आहे.

Congress Jairam Ramesh News: लोकसभा निवडणुकीचे पाच टप्प्यातील मतदान झाले असून, आता फक्त दोन टप्प्यांचे मतदान होणार आहे. तर ४ जून रोजी निकाल लागणार आहे. पाच टप्पे झाल्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यातच आता इंडिया आघाडीला चांगला जनाधार मिळणार असून, स्पष्ट बहुमत मिळेल आणि त्यानंतर दोन दिवसांत पंतप्रधान कोण असेल, याचा निर्णय जाहीर केला जाईल, असा दावा करण्यात आला आहे. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महासचिव जयराम रमेश यांनी याबाबत दावा केला आहे. सर्वांत मोठ्या पक्षाचा नेते पंतप्रधान पदाचा मुख्य दावेदार असेल, २००४ प्रमाणे प्रक्रिया केली जाईल, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. राहुल गांधी पंतप्रधानपदाचे दावेदार असतील का, असा प्रश्न जयराम रमेश यांना विचारण्यात आला होता. यावर पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत मतदान झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.

शॉर्टकट ही मोदींची कार्यशैली, आमची नाही

सन २००४ मध्ये काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना बहुमत मिळाल्याच्या चार दिवसांत मनमोहन सिंग यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी ४ दिवसही लागणार नाहीत. दोन दिवसांत पंतप्रधानांच्या नावाची घोषणा केली जाईल. खासदार एकत्रितपणे निवड करतील. ती एक प्रक्रिया आहे. आम्ही शॉर्टकटवर विश्वास ठेवत नाही. ही मोदींची कार्यशैली असू शकते, आम्ही अहंकारी नाही, निकाल येतील, स्पष्ट जनादेश असेल, निर्णायक जनादेश असेल. यानंतर काही तासांत पंतप्रधानांच्या नावाची घोषणा केली जाईल. सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवारच पंतप्रधान असेल. २००४ मध्ये जसे घडले होते तसे होईल, असे जयराम रमेश यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांची पुनरावृत्ती यंदा पुन्हा पाहायला मिळेल. भाजपाच्या एनडीएचे इंडिया शायनिंग फ्लॉप झाले होते. तसेच आताही दिसून येईल. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या काही टप्प्यातील मतदानानंतर अनेक ठिकाणचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपाच्या कामगिरीबाबत पंतप्रधान मोदी यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे, अशी टीका जयराम रमेश यांनी केली.

 

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी