शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

निवडणुकीत खर्च करायला काँग्रेसकडे पैसे नाहीत, कारण...; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 08:55 IST

भाजपा विश्वासघातकी आहे, खोटं बोलते, खरे लपवते, लोकांमध्ये दिशाभूल करण्यासाठी चुकीची माहिती पसरवते त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन खरगेंनी जनतेला केले.

गुलबर्गा - काँग्रेस पक्ष आर्थिक संकटातून जातोय. ज्या बँक खात्यात लोकांकडून दान आलेले पैसे ठेवले होते त्याला भाजपा सरकारने फ्रिज केले. आयकर विभागाकडून काँग्रेसला दंड ठोठावला असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपावर केला असून आम्ही देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आगामी निवडणुकीत मजबुतीने उभे आहोत, त्यामुळे आम्हाला ताकद द्या असं आवाहन खरगेंनी लोकांना केले. 

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, हा आमच्या पक्षाचा पैसा होता जो लोकांनी देणगी म्हणून दिला होता. मात्र ती बँक खाती गोठवून ठेवण्यात आली. आता आमच्याकडे खर्च करायला पैसा नाही. तर भाजपा निवडणूक बाँन्डबाबत खुलासा करत नाही कारण त्यांची चोरी समोर येऊ शकते. त्यांची चुकीची कामे जनतेसमोर उघडी पडतील. त्यामुळे त्यांनी जुलैपर्यंत वेळ मागितला होता असंही त्यांनी म्हटलं. 

तसेच तुम्ही अजून जिवंत आहात, जिवंत व्यक्तीचे स्मारक बनवले जात नाही. मात्र गुजरातमध्ये एका स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आलं. गुलबर्गातील लोकांनी आता निश्चय केला आहे. त्यांना त्यांची चूक सुधारायची आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेसला विजयी करण्याचा इरादा जनतेने केला आहे असंही मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. 

गुलबर्गामधून खरगे झाले होते पराभूत

२०१९ च्या निवडणुकीत गुलबर्गा जागेवरून मल्लिकार्जुन खरगे यांनी निवडणूक लढली होती परंतु ते निवडणूक हरले. भाजपाचे उमेश जाधव यांनी ९५ हजारांच्या मताधिक्यांनी खरगेंचा पराभव केला. गेल्या अनेक दशकांतील राजकीय जीवनात पहिल्यांदाच खरगेंना मात देण्यात आली. त्यात यंदा राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी आणि इंडिया आघाडीचे समन्वयक म्हणून भूमिका निभावणारे खरगे लोकसभेत उतरणार नाहीत. त्यांच्याऐवजी जावई राधाकृष्ण डोड्डामणि हे मैदानात उतरू शकतात. 

"भाजपा संविधानाच्या विरोधात" 

दरम्यान, भाजपा विश्वासघातकी आहे, खोटं बोलते, खरे लपवते, लोकांमध्ये दिशाभूल करण्यासाठी चुकीची माहिती पसरवते त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. लोकांनी एकत्र राहिले पाहिजे, संविधान आणि लोकशाहीचे रक्षण केले पाहिजे. जर संविधान, स्वातंत्र्य आणि एकता राहिली नाही तर देश गुलामगिरीत जाईल आणि तो पुन्हा उभा राहू शकत नाही असंही मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४