शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

निवडणुकीत खर्च करायला काँग्रेसकडे पैसे नाहीत, कारण...; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 08:55 IST

भाजपा विश्वासघातकी आहे, खोटं बोलते, खरे लपवते, लोकांमध्ये दिशाभूल करण्यासाठी चुकीची माहिती पसरवते त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन खरगेंनी जनतेला केले.

गुलबर्गा - काँग्रेस पक्ष आर्थिक संकटातून जातोय. ज्या बँक खात्यात लोकांकडून दान आलेले पैसे ठेवले होते त्याला भाजपा सरकारने फ्रिज केले. आयकर विभागाकडून काँग्रेसला दंड ठोठावला असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपावर केला असून आम्ही देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आगामी निवडणुकीत मजबुतीने उभे आहोत, त्यामुळे आम्हाला ताकद द्या असं आवाहन खरगेंनी लोकांना केले. 

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, हा आमच्या पक्षाचा पैसा होता जो लोकांनी देणगी म्हणून दिला होता. मात्र ती बँक खाती गोठवून ठेवण्यात आली. आता आमच्याकडे खर्च करायला पैसा नाही. तर भाजपा निवडणूक बाँन्डबाबत खुलासा करत नाही कारण त्यांची चोरी समोर येऊ शकते. त्यांची चुकीची कामे जनतेसमोर उघडी पडतील. त्यामुळे त्यांनी जुलैपर्यंत वेळ मागितला होता असंही त्यांनी म्हटलं. 

तसेच तुम्ही अजून जिवंत आहात, जिवंत व्यक्तीचे स्मारक बनवले जात नाही. मात्र गुजरातमध्ये एका स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आलं. गुलबर्गातील लोकांनी आता निश्चय केला आहे. त्यांना त्यांची चूक सुधारायची आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेसला विजयी करण्याचा इरादा जनतेने केला आहे असंही मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. 

गुलबर्गामधून खरगे झाले होते पराभूत

२०१९ च्या निवडणुकीत गुलबर्गा जागेवरून मल्लिकार्जुन खरगे यांनी निवडणूक लढली होती परंतु ते निवडणूक हरले. भाजपाचे उमेश जाधव यांनी ९५ हजारांच्या मताधिक्यांनी खरगेंचा पराभव केला. गेल्या अनेक दशकांतील राजकीय जीवनात पहिल्यांदाच खरगेंना मात देण्यात आली. त्यात यंदा राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी आणि इंडिया आघाडीचे समन्वयक म्हणून भूमिका निभावणारे खरगे लोकसभेत उतरणार नाहीत. त्यांच्याऐवजी जावई राधाकृष्ण डोड्डामणि हे मैदानात उतरू शकतात. 

"भाजपा संविधानाच्या विरोधात" 

दरम्यान, भाजपा विश्वासघातकी आहे, खोटं बोलते, खरे लपवते, लोकांमध्ये दिशाभूल करण्यासाठी चुकीची माहिती पसरवते त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. लोकांनी एकत्र राहिले पाहिजे, संविधान आणि लोकशाहीचे रक्षण केले पाहिजे. जर संविधान, स्वातंत्र्य आणि एकता राहिली नाही तर देश गुलामगिरीत जाईल आणि तो पुन्हा उभा राहू शकत नाही असंही मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४