शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

काँग्रेसने एका राफेल विमानाची किंमत 746 रुपये ठरवली होती, माजी मुख्यमंत्री ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 9:30 PM

राफेलच्या आगमनाने देशाचा ऊर अभिमानानं भरून आलेला असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संस्कृतमधील एका राष्ट्रभक्तिपर सुभाषितातून राफेलचं स्वागत केलं. काँग्रेसनेही राफेलच्या भारतात दाखल झाल्याचे स्वागत आणि वायू दलाचे अभिनंदन केले आहे.

नवी दिल्ली - आपल्या एकापेक्षा एक जबरदस्त वैशिष्ट्यांमुळे ‘ब्रह्मास्र’ मानली जाणारी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राफेल फायटर जेट आज भारतभूमीवर सुखरूप उतरली. फ्रान्सहून तब्बल सात हजार किलोमीटरचं अंतर कापून आलेल्या या पाच विमानांचं देशभरातून मनःपूर्वक स्वागत होतंय. भारताचं सामरिक सामर्थ्य राफेलच्या आगमनानं प्रचंड वाढलंय आणि स्वाभाविकच देशवासीयांचं मनोधैर्य उंचावलंय. मात्र, राफेलच्या आगमनानंतर काँग्रेसकडून मोदी सरकारला पहिल्या कराराची आठवण करुन देण्यात येत आहे. मात्र, ही आठवण करुन देताना, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्याकडून चूक झाली. त्यानंतर, नेटीझन्सने त्यांना ट्रोल केलं. 

राफेलच्या आगमनाने देशाचा ऊर अभिमानानं भरून आलेला असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संस्कृतमधील एका राष्ट्रभक्तिपर सुभाषितातून राफेलचं स्वागत केलं. काँग्रेसनेही राफेलच्या भारतात दाखल झाल्याचे स्वागत आणि वायू दलाचे अभिनंदन केले आहे. मात्र, राफेलच्या किंमतीवरुन मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत. मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राफेलच्या जुन्या करारातील किंमतीची आठवण करुन दिली. काँग्रेसने एका राफेल विमानाची किंमत 746 रुपये ठरवली होती. मात्र, संसद आणि संसदेबाहेरही सातत्याने विचारणा केल्यानंतरही चौकीदार महोदयाने राफेलच्या खरेदीबाबत माहिती दिली नाही. कारण, चौकीदाराची चोरी उघडी पडली आहे. चौकीदारजी अब तो उसकी किंमत बतोओ... असे दिग्विजयसिंह यांनी म्हटले. मात्र, 746 कोटी लिहिण्याऐवजी  केवळ 746 रुपये लिहिल्याने दिग्विजयसिंह यांना नेटीझन्सने ट्रोल केलंय. त्यानंतर, सिंह यांनी पहिले ट्ट्विट रिट्विट करुन चुकीबद्दल खेद व्यक्त करत 746 कोटी रुपयांना १ असे म्हटले आहे. 

दरम्यान, राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भारतीय वायू दलाचं अभिनंदन करत, मोदी सरकारला ३ प्रश्न विचारले आहेत. भारत सरकार या प्रश्नांचं उत्तर देऊ शकेल का, असे राहुल यांनी म्हटलंय.

526 कोटी रुपयांचं राफेल विमान 1670 कोटी रुपयांना का खरेदी केलं?126 ऐवजी केवळ 36 राफेल विमानंच का खरेदी करण्यात येत आहेत?HAL ऐवजी दिवाळखोर अनिल यांस 30 हजार कोटींचं कॉन्ट्रॅक्ट का देण्यात आलंय? 

असे तीन प्रश्न राहुल गांधींनी विचारले आहेत. राफेल खरेदीवरुन यापूर्वीही काँग्रेसने मोदी सरकारला संसंदेत प्रश्न विचारले होते. तसेच, या खेरदीत मोठा घोटाळा असल्याचा आरोपही काँग्रेसने केला होता. 

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहcongressकाँग्रेसRafale Dealराफेल डीलNarendra Modiनरेंद्र मोदी