शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमुळे काँग्रेसला मिळाली नवसंजीवनी

By admin | Updated: November 9, 2015 00:42 IST

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पराकोटीच्या नैराश्याचा सामना करीत असलेल्या काँग्रेसला बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी नवसंजीवनी मिळाली आहे.

शीलेश शर्मा,  नवी दिल्ली लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पराकोटीच्या नैराश्याचा सामना करीत असलेल्या काँग्रेसला बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी नवसंजीवनी मिळाली आहे. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आता समविचारी पक्षांना सोबत घेऊन मोदी सरकारला घेरण्याची आपली मोहीम अधिक तीव्र करील; परंतु देशभरातील आघाडीच्या राजकारणावर मात्र राज्य पातळीवरच आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यात येतील.आपले धर्मनिरपेक्षतेचे राजकारण आजही प्रासंगिक आहे, असा काँग्रेसचा समज आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तर पत्रपरिषदेत याबाबत जाहीर खुलासादेखील केला आहे. द्वेष आणि विभाजनाचे राजकारण चालणार नाही, हे बिहार निवडणूक निकालांवरून स्पष्ट झाले आहे, असे राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रा. स्व. संघावर थेट हल्लाबोल करताना ते म्हणाले, हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडून निवडणूक जिंकली जाऊ शकत नाही.मोदींनी विदेश दौरे बंद करावेत आणि शेतकरी व युवकांना भेटावे, असा सल्लाही बिहार निवडणूक निकालामुळे अत्याधिक आनंदी झालेले राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना दिला. येणाऱ्या काळात देशाच्या राजकारणात मोठे बदल झालेले दिसतील, असे संकेत राहुल गांधी यांनी दिले.ते पुढे म्हणाले, ‘या देशात विभाजनाच्या राजकारणाला कोणतेही स्थान नाही. बिहार निवडणुकीचे निकाल केवळ बिहारसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे आहेत. मोदींनी आता भाषणे देणे बंद करून कामाला लागावे.