शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

काँग्रेसच्या आघाडी समितीचा आज खरगेंना अहवाल, ‘इंडिया’सोबत ९ राज्यांत युतीसाठी शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 12:05 PM

समितीने जम्मू आणि काश्मीर, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार या नऊ राज्यांमध्ये युती व्हावी, अशी शिफारस केली आहे.

आदेश रावल -

नवी दिल्ली : ‘इंडिया’ आघाडीतील विविध घटक पक्षांशी जागावाटपावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने आघाडी समिती स्थापन केली होती. ही समिती बुधवारी (दि.३) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आपला अहवाल सादर करील. 

समितीने जम्मू आणि काश्मीर, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार या नऊ राज्यांमध्ये युती व्हावी, अशी शिफारस केली आहे. या समितीने प्रथम प्रदेश काँग्रेस समित्यांशी चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते आणि राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आले होते. सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर कोणत्या जागा आवश्यक आहेत व कोणत्या जागा सोडता येतील, याबाबत सल्लामसलत करण्यात आली. 

आता सविस्तर अहवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष आणि संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल इंडिया आघाडीतील घटकपक्षांशी जागावाटपावर चर्चा करतील. 

काँग्रेसच्या या आघाडी समितीत राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, गुजरातचे प्रभारी महासचिव मुकुल वासनिक, बिहारचे प्रभारी सरचिटणीस मोहन प्रकाश आणि सलमान खुर्शीद यांचा समावेश होता.

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी