शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Jammu And Kashmir : ...म्हणून काँग्रेसचा 'बीडीसी' निवडणुकीवर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 18:00 IST

काँग्रेसने 'ब्लॉक डेव्हलपमेंट काउंसिल' (बीडीसी)च्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 

ठळक मुद्देकाँग्रेसने 'ब्लॉक डेव्हलपमेंट काउंसिल' (बीडीसी)च्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक नेत्यांच्या सुटकेसाठी निर्णय घेतला. नॅशनल कॉन्फरन्स व पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीने याआधी बीडीसी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.

नवी दिल्ली - केंद्र सरकराने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले. त्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती बिघडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून काही नेत्यांना नजरकैद केले आहे. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक नेत्यांच्या सुटकेसाठी आता काँग्रेसने 'ब्लॉक डेव्हलपमेंट काउंसिल' (बीडीसी)च्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 

नॅशनल कॉन्फरन्स व पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीने याआधी बीडीसी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता काँग्रेसने देखील स्थानिक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेले असल्याने हा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख गुलाम अहमद मीर यांनी बुधवारी (9 ऑक्टोबर) याबाबत माहिती दिली आहे. 'स्थानिक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. राजकीय नेत्यांना स्थानबद्ध केलेले असताना निवडणूक कशी घेतली जाऊ शकते. बीडीसी निवडणुकीची घोषणा करण्याअगोदरच निवडणूक आयोगाने स्थानिक राजकीय पक्षांशी चर्चा करायला हवी होती. जर सरकारने स्थानिक नेत्यांची मुक्तता केली असती तर आम्ही देखील निवडणुकीत सहभागी झालो असतो. मात्र आता आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार टाकत आहोत' असं गुलाम अहमद मीर यांनी म्हटलं आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये 24 ऑक्टोबर रोजी बीडीसीची निवडणूक होणार आहे. मोदी सरकार पक्षाला फायदा व्हावा यासाठीच बीडीसी निवडणूक घेत आहे. आमचे स्थानिक नेते नजरकैदेत आहेत. त्यामुळे आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार टाकत आहोत असं मीर यांनी म्हटलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या राजकीय नेत्यांची लवकरच सुटका केली जाणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी दिली होती. तसेच ते त्यांची राजकीय कामे सुरू करू शकतील असं म्हटलं होतं.

राम माधव यांनी 'राज्यपाल राजवट उठवल्यानंतर विधिमंडळ सूत्रे हाती घेईल. त्यानंतर अनुसूचित जाती आयोग, महिला आयोग, अल्पसंख्याक आयोग यांची स्थापना करण्यात येणार आहे. कलम 370 हा सत्तर वर्षांपासूनचा कर्करोग होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो दूर केला आहे. गेली अनेक वर्षे कायदा व सुव्यवस्था सुरळीत नसलेला हा भाग आता शांत असून दोनशे नेते नजरकैदेत आहेत. हजारो लोकांना अटक केल्याचा प्रचार खरा नाही. कायदा व सुव्यवस्थेसाठी दोनशे लोकांना नजरकैदेत ठेवण्यात काही गैर नाही. त्यामुळे मानवी हक्कांचे उल्लंघन होत नाही' असं म्हटलं होतं. तसेच 'पंचतारांकित हॉटेलमध्ये टीव्ही, पुस्तके, इतर सर्व सुविधा देत या नेत्यांची सोय करण्यात आली आहे. ती तात्पुरती व्यवस्था आहे. दोनशे लोक स्थानबद्ध असल्याने काश्मीरमध्ये शांतता आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांना स्थानबद्ध करणे किती महत्त्वाचे होते हे यातून लक्षात येते. त्यांना कायम कैदेत ठेवण्यात येणार नाही तर सोडून देण्यात येईल' असंही राम माधव यांनी म्हटलं होतं. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीरElectionनिवडणूक