शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

'लाल डोळे कधी दिसणार?', चिनी सैनिकांच्या घुसखोरीवरून काँग्रेसचा नरेंद्र मोदींवर निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 17:04 IST

पँगाँग तलावाच्या दक्षिणी किनाऱ्यावरून चिनी सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देगेल्या चार महिन्यांपासून पूर्व लडाखमधील सीमावर्ती भागातील तणाव कमी झालेला नाही. तणाव कमी करण्यासाठी दोन्ही सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे.

नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये पुन्हा एकदा झटापट झाल्याची माहिती समोर येत आहे. पूर्व लडाखमधील पँगाँग तलाव परिसरात चिनी सैनिकांनी  घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिले. भारत आणि चीन सैन्यामध्ये झालेल्या बैठकांमध्ये काही गोष्टींबद्दल सहमती झाली होती. मात्र, त्यांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात आल्याची माहिती भारतीय सैन्याने दिली आहे. दरम्यान, यावरून काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोळ्यात चीनविरोधात राग कधी दिसणार, असा सवाल काँग्रेसने केला आहे. यासंदर्भात कांग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी ट्विट केले आहे. भारताच्या हद्दीत घुसण्याचा पुन्हा प्रयत्न झाला. चीनकडून सतत अशा प्रकारचे कृत्य सुरु आबे. पँगाँग परिसर, गोगरा व गलवान खोरे, डेपसंग, प्लॅनस, लिपुलेख या भागात भारतीय जवान आपले कर्तव्य बजावत आहेत. पण, मोदींचे लाल डोळे कधी दिसणार? असा सवाल रणदीपसिंह सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेसचे नेते जयवीर शेरगिल यांनीही ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर निशाणा साधला आहे. "सोशल मीडियावरील इतर मुद्द्यांचा बचाव करण्यासाठी भाजपा अॅक्टिव्ह मोडमध्ये येते. परंतु चीनच्या मुद्द्यांवर स्लीपमोडमध्ये आहे. या मुद्द्यांवर पत्रकार परिषद कधी होईल? घुसखोरी कशामुळे झाली? यथास्थिती केव्हा पुनर्संचयित केली जाईल? बेदखल करण्यासाठी कोणती पावले उचलली गेली? सरकार चीनचे नाव घेण्यास का घाबरत आहे?", असे प्रश्न जयवीर शेरशिल यांनी केले आहेत.

दरम्यान, पँगाँग तलावाच्या दक्षिणी किनाऱ्यावरून चिनी सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केला. त्याला भारताने विरोध केला. चिनी सैन्याला भारतीय सैन्याने रोखले. त्यानंतर भारताने या भागातील फौजफाटा वाढविला. गेल्या चार महिन्यांपासून पूर्व लडाखमधील सीमावर्ती भागातील तणाव कमी झालेला नाही. तणाव कमी करण्यासाठी दोन्ही सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. मात्र अद्यापही परिस्थितीत बदल झालेला नाही. एप्रिल पूर्वी असलेली परिस्थिती कायम ठेवावी, अशी स्पष्ट भूमिका भारतानं घेतलेली आहे. एका बाजूला लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू असताना दुसऱ्या बाजूला परराष्ट्र मंत्रालयांच्या माध्यमातूनही चर्चा सुरू आहेत. पूर्व लडाखमधून सैन्य माघारी घेण्याबद्दल दोन्ही देशाचे एकमत झाले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

आणखी बातम्या...

- फ्री ट्रायलसोबत JioFiber चे नवे प्लॅन लाँच, OTT अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळणार    

- 'या' कंपनीकडून Permanent Work From Homeची सुविधा, ७५ टक्के कर्मचारी करणार घरून काम    

- 'पिया तू अब तो आजा...' या गाण्यावर वृद्ध महिलांचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल    

टॅग्स :congressकाँग्रेसladakhलडाखindia china faceoffभारत-चीन तणावNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा