शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

UP Election 2022: “BJP ने आजपर्यंत कधीही कोणत्याही महिलेला पक्षाध्यक्ष बनवले नाही”; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 09:02 IST

UP Election 2022: राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी यानंतर भाजपवर टीका केली आहे.

ठळक मुद्देभाजपने आजपर्यंत कधीही कोणत्याही महिलेला पक्षाध्यक्ष बनवले नाहीभाजपच्या विरोधी विचारधारेमुळे उत्तर प्रदेशमध्ये महिला असुरक्षित आहेतमहिला सशक्तीकरणातून भाजपचे कुशासन संपुष्टात आणण्याचे काम काँग्रेस करेल

जयपूर: आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) पार्श्वभूमीवर काँग्रेसने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत महिलांना ४० टक्के उमेदवारी देण्याची घोषणा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (Congress) सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी केली आहे. या घोषणेचे काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी स्वागत केले आहे. यावरून आता राजकारण तापताना पाहायला मिळत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी यानंतर भाजपवर टीका केली आहे. भाजपने आजपर्यंत कधीही कोणत्याही महिलेला पक्षाध्यक्ष बनवले नाही, असे म्हटले आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये महिलांना ४० टक्के उमेदवारी देण्याचा प्रियंका गांधी यांनी जाहीर केलेला निर्णय अतिशय स्तुस्त्य असून, त्याचे स्वागत करतो. काँग्रेसने देशाला महिला पंतप्रधान, राष्ट्रपती दिल्या आहेत. महिला सशक्तीकरणाचे ध्येय घेऊन जाणारा काँग्रेस सर्वांत जुना पक्ष आहे, असे अशोक गेहलोत म्हणाले. 

भाजपने आजपर्यंत कोणत्याही महिलेला पक्षाध्यक्ष बनवले नाही

भाजपने आजपर्यंत कधीही कोणत्याही महिलेला पक्षाध्यक्ष बनवले नाही. भाजपच्या विरोधी विचारधारेमुळे उत्तर प्रदेशमध्ये महिला असुरक्षित आहेत, असा दावा गेहलोत यांनी केला आहे. तसेच महिला सशक्तीकरणाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे कुशासन संपुष्टात आणण्याचे काम काँग्रेस करेल, असा विश्वास गेहलोत यांनी यावेळी व्यक्त केला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन महिलांना राजकारणात मोठी संधी उपलब्ध करुन दिली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ४० टक्के उमेदवारी देण्याचा निर्णय घेऊन काँग्रेस पक्षाने महिलांना राजकारणात आणखी महत्वाची संधी देण्याचे पाऊल उचचले आहे, असे गेहलोत म्हणाले.

दरम्यान, पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत विधानसभा निवडणुका होतील, असे म्हटले जात आहे. सन २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४०३ जागांवर विजय मिळाला होता. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने आघाडी करून ही निवडणूक लढवली होती. समाजवादी पक्षाला ४७ तर, काँग्रेसला ७ जागांवर समाधान मानावे लागले होते.  

टॅग्स :PoliticsराजकारणAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसBJPभाजपा