शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

UP Election 2022: “BJP ने आजपर्यंत कधीही कोणत्याही महिलेला पक्षाध्यक्ष बनवले नाही”; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 09:02 IST

UP Election 2022: राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी यानंतर भाजपवर टीका केली आहे.

ठळक मुद्देभाजपने आजपर्यंत कधीही कोणत्याही महिलेला पक्षाध्यक्ष बनवले नाहीभाजपच्या विरोधी विचारधारेमुळे उत्तर प्रदेशमध्ये महिला असुरक्षित आहेतमहिला सशक्तीकरणातून भाजपचे कुशासन संपुष्टात आणण्याचे काम काँग्रेस करेल

जयपूर: आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) पार्श्वभूमीवर काँग्रेसने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत महिलांना ४० टक्के उमेदवारी देण्याची घोषणा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (Congress) सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी केली आहे. या घोषणेचे काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी स्वागत केले आहे. यावरून आता राजकारण तापताना पाहायला मिळत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी यानंतर भाजपवर टीका केली आहे. भाजपने आजपर्यंत कधीही कोणत्याही महिलेला पक्षाध्यक्ष बनवले नाही, असे म्हटले आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये महिलांना ४० टक्के उमेदवारी देण्याचा प्रियंका गांधी यांनी जाहीर केलेला निर्णय अतिशय स्तुस्त्य असून, त्याचे स्वागत करतो. काँग्रेसने देशाला महिला पंतप्रधान, राष्ट्रपती दिल्या आहेत. महिला सशक्तीकरणाचे ध्येय घेऊन जाणारा काँग्रेस सर्वांत जुना पक्ष आहे, असे अशोक गेहलोत म्हणाले. 

भाजपने आजपर्यंत कोणत्याही महिलेला पक्षाध्यक्ष बनवले नाही

भाजपने आजपर्यंत कधीही कोणत्याही महिलेला पक्षाध्यक्ष बनवले नाही. भाजपच्या विरोधी विचारधारेमुळे उत्तर प्रदेशमध्ये महिला असुरक्षित आहेत, असा दावा गेहलोत यांनी केला आहे. तसेच महिला सशक्तीकरणाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे कुशासन संपुष्टात आणण्याचे काम काँग्रेस करेल, असा विश्वास गेहलोत यांनी यावेळी व्यक्त केला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन महिलांना राजकारणात मोठी संधी उपलब्ध करुन दिली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ४० टक्के उमेदवारी देण्याचा निर्णय घेऊन काँग्रेस पक्षाने महिलांना राजकारणात आणखी महत्वाची संधी देण्याचे पाऊल उचचले आहे, असे गेहलोत म्हणाले.

दरम्यान, पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत विधानसभा निवडणुका होतील, असे म्हटले जात आहे. सन २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४०३ जागांवर विजय मिळाला होता. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने आघाडी करून ही निवडणूक लढवली होती. समाजवादी पक्षाला ४७ तर, काँग्रेसला ७ जागांवर समाधान मानावे लागले होते.  

टॅग्स :PoliticsराजकारणAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसBJPभाजपा