शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
2
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
3
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
4
पुढच्या महिन्यात येतोय फिजिक्सवालाचा आयपीओ, ₹३८२० कोटी उभारणार, काय आहेत अधिक डिटेल्स?
5
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
6
WhatsApp वर येणार Facebook सारखं नवं फीचर; प्रोफाईलवर लावता येणार सुंदर कव्हर फोटो
7
धक्कादायक! रोहित आर्याने उर्मिला कोठारे, गिरीश ओक यांनाही स्टुडिओत बोलवलेलं, मुलांसोबत फोटोही काढले अन्...
8
राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
9
"बुलडोजरनं चिरडून 'त्यांना' 'जहन्नुम'मध्ये...", बिहारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
10
Vastu Tips: खिडकीत, अंगणात पोपटाचे येणे हे तर लक्ष्मी कृपेचे शुभ चिन्ह; पाहा वास्तू संकेत!
11
अपहरणाचा सीन, फिल्म प्रोजेक्ट..., रोहित आर्याने मराठी अभिनेत्रीला केलेला मेसेज; स्क्रीनशॉट दाखवत म्हणाली....
12
महिलांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये लग्न पत्रिका आली, क्लिक करताच फोन हँग झाला अन्...; नव्या सायबर ट्रॅपने उडवली झोप!
13
आता घरबसल्या करा आधार कार्ड अपडेट; 'ई-आधार ॲप' लवकरच लॉन्च, काय-काय बदलता येणार?
14
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
15
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
16
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
17
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
18
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
19
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
20
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...

काँग्रेस मुख्यालयासमोर संगणक पदवीधारकांवर आली कोंबडा बनण्याची वेळ; जाणून घ्या नेमकं काय झालं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 17:18 IST

Computer Post Graduates And Congress : संगणक पदवीधारकांना नवी दिल्लीतील (New Delhi) काँग्रेस मुख्यालयासमोर कोंबडा बनण्याची वेळ आली आहे.

नवी दिल्ली - राजस्थान सरकारने (Rajasthan Government) 2020-21 च्या अर्थसंकल्पात संगणक शिक्षक (Computer teachers) कॅडर तयार करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे संगणक पदवीधारकांना आनंद झाला होता. सरकारी नोकरी मिळणार म्हणून अनेकजण यासाठी तयारीला लागले होते. मात्र आता राजस्थान सरकारनं यावर घुमजाव केलं आहे. संगणक शिक्षक या  नियमित (Permanent)  पदासाठी आधी अर्ज मागवण्यात येणार होते. मात्र सरकारच्या नवीन घोषणेनुसार ही पदं कॉन्ट्रॅक्टवर (Contract) असणार आहे. यामुळे संगणक पदवीधारकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

राजस्थानमधील (Rajasthan) संगणक पदवीधारकांना (Computer Degree holders) नवी दिल्लीतील (New Delhi) काँग्रेस मुख्यालयासमोर (Congress Head Office) कोंबडा बनण्याची वेळ आली आहे. काही युवा संगणक पदवीधर दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयासमोर आंदोलन करत आहेत. कधी शाळेतील शिक्षेप्रमाणे कोंबडा बनत तर कधी दुसऱ्या पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे. कॉन्ट्रॅक्टवरील ही पदं नियमित (Permanent) करण्यात यावी मागणीसाठी या पदवीधारकांनी राजस्थान सरकारपासून ते गांधी परिवारापर्यंत सर्वांकडे याबाबत मागणी केली आहे.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka gandhi) यांनी उत्तर प्रदेशातील अशाच एका मुद्द्यावर टीका केली होती, मात्र आता राजस्थानमध्ये संगणक पदवी धारकांवर अन्याय होत असताना प्रियंका गांधी शांत का आहेत? हा बेरोजगारांचा अपमान आहे असं या संगणक पदवीधारकांचं म्हणणं आहे. मागील काही दिवसांपासून हे पदवीधर इथे आंदोलन करत आहेत, त्यांनी काँग्रेसमधील काही बड्या नेत्यांची भेट घेऊन याबद्दल मागणी केली आहे, मात्र यावर अजून काही स्पष्टता नाही अशीही माहिती या पदवी धारकांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"संकटाच्या वेळीही केंद्राने पेट्रोल-डिझेलवर कराच्या रुपात देशवासीयांकडून 4 लाख कोटी केले वसूल"

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारला पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींविषयी प्रश्न विचारला आहे. काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या काळात जनतेला कसा दिलासा दिला जात होता, याचा हवाला देत प्रियंका गांधी यांनी सोशल मीडियावर केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. "संकटाच्या वेळीही केंद्राने पेट्रोल-डिझेलवर कराच्या रुपात देशवासीयांकडून 4 लाख कोटी केले वसूल" असं म्हणत निशाणा साधला आहे. प्रियंका गांधी यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कासंदर्भात मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील करात 12 पट वाढ करुन जनतेची लूट केली जात आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसStudentविद्यार्थीIndiaभारतRajasthanराजस्थानPriyanka Gandhiप्रियंका गांधी