शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

'पूर्ण परीक्षा प्रणाली फसवणूक, पैशाने पेपर विकत घेता येतो...' NEET मुद्द्यावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल,मंत्री धर्मेंद्र प्रधान संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 14:27 IST

नीट परिक्षेवरुन आज लोकसभेत खासदार राहुल गांधी यांनी सरकारला धारेवर धरले, यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान संतापल्याचे पाहायला मिळाले.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याआधी लोकसभेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नीट परिक्षेवरुन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान संतापल्याचे पाहायला मिळाले. 

NEET परिक्षेवरुन काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि द्रमुक सारख्या विरोधी पक्षांनी सरकारला घेरले आणि NEET परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. यावेळी लोकसभेत काँग्रेसच्या वतीने प्रभारी नेतृत्व करत असलेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विरोध केला यामुळे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान संतापले.

Economic Survey: आर्थिक सर्वेक्षणात सरकारनं सांगितला FY25 मध्ये किती राहणार GDP ग्रोथ? एका मोठ्या आव्हानाचाही उल्लेख

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले,  'देशात लाखो विद्यार्थी जे घडत आहे त्याबद्दल चिंतित आहेत त्यांचा भारतीय परीक्षा प्रणाली फसवी असल्याचा विश्वास आहे. जर तुम्ही श्रीमंत असाल आणि तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही भारतीय परीक्षा पद्धतीत पास होऊ शकता, तुम्ही पैशाने कागद खरेदी करू शकता हे लोकांना माहीत आहे आणि विरोधकांचीही तीच भावना आहे.

राहुल गांधी म्हणाले की, 'संपूर्ण देशाला हे स्पष्ट झाले आहे की आपल्या परीक्षा पद्धतीत खूप गंभीर समस्या आहेत. फक्त NEET मध्येच नाही तर सर्व प्रमुख परीक्षांमध्ये असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मंत्री यांना द्यावी लागतील. सिस्टीमिक स्तरावर याचे निराकरण करण्यासाठी तुम्ही काय करत आहात? मंत्री महोदयांनी स्वतः सोडून सगळ्यांनाच दोष दिला आहे. मला वाटत नाही की त्यांना इथे काय चालले आहे याची मूलभूत माहिती देखील समजत नाही, असंही राहुल गांधी म्हणाले. 

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान संतापले. सभागृहाला बोलताना म्हणाले, 'मला कोणाकडूनही माझ्या शिक्षणाचे प्रमाणपत्र नको आहे. माझ्या जनतेने मला निवडून पाठवले आहे. माझ्या पंतप्रधानांनी मला जबाबदारी दिली आहे. देशाची परीक्षा प्रणाली रद्दबातल आहे असे म्हणणे. यापेक्षा दुर्दैवी काहीही असू शकत नाही, असंही धर्मेंद्र प्रधान म्हणाले. 

मंत्री धर्मेंद्र  प्रधान यांची काँग्रेसवर टीका

मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला.'कपिल सिब्बल यांनी २०१० साली त्यांच्या सरकारमध्ये शिक्षण सुधारणा विधेयक आणले होते. त्यावर आज राहुल गांधी प्रश्न उपस्थित करत आहेत. गेल्या ७ वर्षांत पेपरफुटीचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. हे नीट परिक्षा प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. मी पूर्ण जबाबदारीने सांगू शकतो की NTA नंतर २४० हून अधिक परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या आहेत, असंही धर्मेंद्र प्रधान म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा