शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

'पूर्ण परीक्षा प्रणाली फसवणूक, पैशाने पेपर विकत घेता येतो...' NEET मुद्द्यावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल,मंत्री धर्मेंद्र प्रधान संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 14:27 IST

नीट परिक्षेवरुन आज लोकसभेत खासदार राहुल गांधी यांनी सरकारला धारेवर धरले, यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान संतापल्याचे पाहायला मिळाले.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याआधी लोकसभेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नीट परिक्षेवरुन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान संतापल्याचे पाहायला मिळाले. 

NEET परिक्षेवरुन काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि द्रमुक सारख्या विरोधी पक्षांनी सरकारला घेरले आणि NEET परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. यावेळी लोकसभेत काँग्रेसच्या वतीने प्रभारी नेतृत्व करत असलेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विरोध केला यामुळे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान संतापले.

Economic Survey: आर्थिक सर्वेक्षणात सरकारनं सांगितला FY25 मध्ये किती राहणार GDP ग्रोथ? एका मोठ्या आव्हानाचाही उल्लेख

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले,  'देशात लाखो विद्यार्थी जे घडत आहे त्याबद्दल चिंतित आहेत त्यांचा भारतीय परीक्षा प्रणाली फसवी असल्याचा विश्वास आहे. जर तुम्ही श्रीमंत असाल आणि तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही भारतीय परीक्षा पद्धतीत पास होऊ शकता, तुम्ही पैशाने कागद खरेदी करू शकता हे लोकांना माहीत आहे आणि विरोधकांचीही तीच भावना आहे.

राहुल गांधी म्हणाले की, 'संपूर्ण देशाला हे स्पष्ट झाले आहे की आपल्या परीक्षा पद्धतीत खूप गंभीर समस्या आहेत. फक्त NEET मध्येच नाही तर सर्व प्रमुख परीक्षांमध्ये असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मंत्री यांना द्यावी लागतील. सिस्टीमिक स्तरावर याचे निराकरण करण्यासाठी तुम्ही काय करत आहात? मंत्री महोदयांनी स्वतः सोडून सगळ्यांनाच दोष दिला आहे. मला वाटत नाही की त्यांना इथे काय चालले आहे याची मूलभूत माहिती देखील समजत नाही, असंही राहुल गांधी म्हणाले. 

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान संतापले. सभागृहाला बोलताना म्हणाले, 'मला कोणाकडूनही माझ्या शिक्षणाचे प्रमाणपत्र नको आहे. माझ्या जनतेने मला निवडून पाठवले आहे. माझ्या पंतप्रधानांनी मला जबाबदारी दिली आहे. देशाची परीक्षा प्रणाली रद्दबातल आहे असे म्हणणे. यापेक्षा दुर्दैवी काहीही असू शकत नाही, असंही धर्मेंद्र प्रधान म्हणाले. 

मंत्री धर्मेंद्र  प्रधान यांची काँग्रेसवर टीका

मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला.'कपिल सिब्बल यांनी २०१० साली त्यांच्या सरकारमध्ये शिक्षण सुधारणा विधेयक आणले होते. त्यावर आज राहुल गांधी प्रश्न उपस्थित करत आहेत. गेल्या ७ वर्षांत पेपरफुटीचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. हे नीट परिक्षा प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. मी पूर्ण जबाबदारीने सांगू शकतो की NTA नंतर २४० हून अधिक परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या आहेत, असंही धर्मेंद्र प्रधान म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा