शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

कुमारस्वामी-सिद्धरामय्यांमध्ये सत्तांतरावरून जुंपली; पोपट-गिधाडाची दिली उपमा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 8:32 PM

कर्नाटकमध्ये या 15 जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार पडल्याच्या वादाने डोके वर काढले आहे.

बेंगळुरू : कर्नाटकमध्ये दोन महिने चाललेल्या राजकीय नाट्यानंतर कुमारस्वामींना पायउतार व्हावे लागले होते. काँग्रेससह त्यांच्याच पक्षातील आमदारांनी सरकारविरोधात बंड पुकारत मुंबई गाठली होती. बरेच प्रयत्न करूनही या 15 आमदारांचे मन वळविण्यात जेडीएस आणि काँग्रेसच्या नेत्यांना अपयश आले होते. शेवटी कुमारस्वामींना राजीनामा द्यावा लागला होता. यामागे भाजपाचे य़ेडीयुराप्पा यांचा हात होताच, पण सिद्धरामय्यांचीही फूस असल्याची चर्चा होती. 

कर्नाटकमध्ये या 15 जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार पडल्याच्या वादाने डोके वर काढले आहे. या मुद्द्यावर काँग्रेस आणि जेडीएसचे नेते आरोप प्रत्यारोप करत आहेत. सिद्धरामय्यांनी ट्विट करताना म्हटले की, चार दशकांच्या राजकीय अनुभवानंतरही मी गिधाडाला पोपट समजण्याची चूक केली आणि आघाडी केली. यानंतर कुमारस्वामींनी प्रत्यूत्तर देताना म्हटले की, काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या संमतीने मी मुख्यमंत्री बनलो होतो. हीच गोष्ट सिद्धरामय्यांना पटली नाही, यामुळे सरकार जास्त काळ टिकले नाही. 

यानंतर हा वाद काही शमन्याचे नाव घेत नाहीय. सिद्धरामय्या यांनी हुबळीमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले की, कुमारस्वामी समजूतदारपणे बोलत नाहीत. त्यांच्या सरकारमधील मंत्री आणि बंधू जी टी देवेगौडा यांनी लोकसभा निवडणुकीवेळी म्हैसूर आणि चामराजनगरमध्ये भाजपाच्या उमेदवारांना मत देण्याचे आदेश दिले होते. आता पोटनिवडणुका आल्या आणि ते नाटक करू लागलेत. यावेळी सिद्धरामय्या यांनी एका लोकप्रिय कन्नड गीताचा हवाला दिला. या गीतामध्ये मालक एका पोपटाचे पालन पोषण करतो, मात्र नंतर तोच पोपट विश्वासघात करतो. सिद्धरामय्या यांनी या गीतातून कुमारस्वामींच्या आरोपांना उत्तर दिले. कुमारस्वामींना तुमकूरमधून एच डी देवेगौडा, मंड्यामधून निखिल कुमारस्वामी आणि कोलारमधून काँग्रेसचे उमेदवार मुनियप्पा यांच्या लोकसभेतील पराभवाला सिध्दरामय्यांना जबाबदार धरले होते. 

सिद्धरामय्यांनी त्यांच्या आमदारांना सांगितले होते की, लोकसभेनंतर एकही सेकंदासाठी कुमारस्वामींचे सरकार चालू देणार नाही, असे कुमारस्वामींना चेन्नापटनामध्ये सांगितले होते. सिद्धरामय्या यांनी राजकारण शिकविणाऱ्य़ा  देवेगौडांचाच विश्वासघात केला आहे. मला नाही माहिती की सरकार का पडले, पण मी सिद्धरामय्यांचा पाळलेला पोपट नाही. रामनगरच्या लोकांनी मला सांभाळले आहे. 

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीsiddaramaiahसिद्धरामय्याKarnatak Politicsकर्नाटक राजकारण