शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ममतांचा आरोप; "इतर कुणाची हिम्मत नाही, अमित शाहंनीच घडवून आणला पुतण्यावरील हल्ला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 17:50 IST

ममता म्हणाल्या, त्रिपुरा, आसाम आणि यूपीसह जेथे-जेथे भाजप सत्तेत आहे, तेथे-तेथे अराजक निर्माण झाले आहे. आम्ही अभिषेक बॅनर्जी आणि त्रिपुरातील कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो.

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीत सुरू झालेला संघर्ष आता थेट त्रिपुरात जाऊन पोहोचला आहे. आता, पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांच्यावर त्रिपुरात झालेल्या हल्लावरून, ममता भडकल्या आहेत. एवढेच नाही, तर त्यांनी भाजप नेते आणि गृहंमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

ममता यांनी सोमवारी कोलकाता येथे त्रिपुरा येथील घटनेत जखमी झालेल्या टीएमसी कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी ममता म्हणाल्या, हा हल्ला गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून झाला. या घटनेमागे त्यांचाच हात आहे. त्रिपुरा, आसाम आणि यूपीसह जेथे-जेथे भाजप सत्तेत आहे, तेथे-तेथे अराजक निर्माण झाले आहे. आम्ही अभिषेक बॅनर्जी आणि त्रिपुरातील कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो.

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच? संशयास्पद अवस्थेत आढळले भाजपच्या दोन कार्यकर्त्यांचे मृतदेह

ममता म्हणाल्या, या हल्ल्यात सुदीप आणि जया जखमी झाले आहेत. ते विद्यार्थी असून त्रिपुराला गेले होते. त्याच्या डोक्याला मार लागला आहे. दुःखद गोष्ट म्हणजे, पोलीस उपस्थित असताना हा हाल्ला झाला. यानंतर कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सुविधाही देण्यात आली नाही. उलट त्यांनाच अटक करण्यात आली. एवढेच नाही, तर त्यांना एक ग्लास पाणीही दिले गेले नाही.

भाजपवर हल्ला चढवताना ममता म्हणाल्या, या हिंसक घटनेनंतरही मी मागे हटणार नाही. जेथे भाजपची सत्ता आहे तेथे टीएमसीच्या कार्यकर्त्यांवर दिवसाढवळ्या हल्ले केले जात आहेत. यानंतरही पोलीस आणि प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही.

...तर वीज महाग होईल; कंपन्या नफा कमावतील; नव्या वीज विधेयकाविरोधात ममतांनी दंड थोपटला

त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांची हिम्मत नाही, अमित शहाच करत आहेत हल्ले -मुख्यमंत्री ममता म्हणाल्या, 'केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सक्रिय पाठिंब्याशिवाय, असे हल्ले शक्य नाहीत. त्रिपुरा पोलिसांच्या उपस्थितीत झालेल्या या हल्ल्यामागे तेच आहेत आणि त्रिपुरा पोलीस फक्त बघत राहिले. त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांमध्ये, असे हल्ले करण्याची क्षमता नाही. त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक यांच्या ताफ्यावर काठ्यांसह काही लोकांनी हल्ला केला होता. आता, हे हल्ला करणारे लोक भाजपचेच कार्यकर्ते होते, असा आरोप टीएमसीने केला आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAmit Shahअमित शहाwest bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेसTripuraत्रिपुराBJPभाजपा