शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

ममतांचा आरोप; "इतर कुणाची हिम्मत नाही, अमित शाहंनीच घडवून आणला पुतण्यावरील हल्ला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 17:50 IST

ममता म्हणाल्या, त्रिपुरा, आसाम आणि यूपीसह जेथे-जेथे भाजप सत्तेत आहे, तेथे-तेथे अराजक निर्माण झाले आहे. आम्ही अभिषेक बॅनर्जी आणि त्रिपुरातील कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो.

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीत सुरू झालेला संघर्ष आता थेट त्रिपुरात जाऊन पोहोचला आहे. आता, पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांच्यावर त्रिपुरात झालेल्या हल्लावरून, ममता भडकल्या आहेत. एवढेच नाही, तर त्यांनी भाजप नेते आणि गृहंमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

ममता यांनी सोमवारी कोलकाता येथे त्रिपुरा येथील घटनेत जखमी झालेल्या टीएमसी कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी ममता म्हणाल्या, हा हल्ला गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून झाला. या घटनेमागे त्यांचाच हात आहे. त्रिपुरा, आसाम आणि यूपीसह जेथे-जेथे भाजप सत्तेत आहे, तेथे-तेथे अराजक निर्माण झाले आहे. आम्ही अभिषेक बॅनर्जी आणि त्रिपुरातील कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो.

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच? संशयास्पद अवस्थेत आढळले भाजपच्या दोन कार्यकर्त्यांचे मृतदेह

ममता म्हणाल्या, या हल्ल्यात सुदीप आणि जया जखमी झाले आहेत. ते विद्यार्थी असून त्रिपुराला गेले होते. त्याच्या डोक्याला मार लागला आहे. दुःखद गोष्ट म्हणजे, पोलीस उपस्थित असताना हा हाल्ला झाला. यानंतर कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सुविधाही देण्यात आली नाही. उलट त्यांनाच अटक करण्यात आली. एवढेच नाही, तर त्यांना एक ग्लास पाणीही दिले गेले नाही.

भाजपवर हल्ला चढवताना ममता म्हणाल्या, या हिंसक घटनेनंतरही मी मागे हटणार नाही. जेथे भाजपची सत्ता आहे तेथे टीएमसीच्या कार्यकर्त्यांवर दिवसाढवळ्या हल्ले केले जात आहेत. यानंतरही पोलीस आणि प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही.

...तर वीज महाग होईल; कंपन्या नफा कमावतील; नव्या वीज विधेयकाविरोधात ममतांनी दंड थोपटला

त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांची हिम्मत नाही, अमित शहाच करत आहेत हल्ले -मुख्यमंत्री ममता म्हणाल्या, 'केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सक्रिय पाठिंब्याशिवाय, असे हल्ले शक्य नाहीत. त्रिपुरा पोलिसांच्या उपस्थितीत झालेल्या या हल्ल्यामागे तेच आहेत आणि त्रिपुरा पोलीस फक्त बघत राहिले. त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांमध्ये, असे हल्ले करण्याची क्षमता नाही. त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक यांच्या ताफ्यावर काठ्यांसह काही लोकांनी हल्ला केला होता. आता, हे हल्ला करणारे लोक भाजपचेच कार्यकर्ते होते, असा आरोप टीएमसीने केला आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAmit Shahअमित शहाwest bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेसTripuraत्रिपुराBJPभाजपा