शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
3
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
4
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
5
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
6
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
7
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
8
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
9
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
10
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
11
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
12
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
13
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
14
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
15
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
16
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
17
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
18
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
19
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
20
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज

ममतांचा आरोप; "इतर कुणाची हिम्मत नाही, अमित शाहंनीच घडवून आणला पुतण्यावरील हल्ला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 17:50 IST

ममता म्हणाल्या, त्रिपुरा, आसाम आणि यूपीसह जेथे-जेथे भाजप सत्तेत आहे, तेथे-तेथे अराजक निर्माण झाले आहे. आम्ही अभिषेक बॅनर्जी आणि त्रिपुरातील कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो.

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीत सुरू झालेला संघर्ष आता थेट त्रिपुरात जाऊन पोहोचला आहे. आता, पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांच्यावर त्रिपुरात झालेल्या हल्लावरून, ममता भडकल्या आहेत. एवढेच नाही, तर त्यांनी भाजप नेते आणि गृहंमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

ममता यांनी सोमवारी कोलकाता येथे त्रिपुरा येथील घटनेत जखमी झालेल्या टीएमसी कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी ममता म्हणाल्या, हा हल्ला गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून झाला. या घटनेमागे त्यांचाच हात आहे. त्रिपुरा, आसाम आणि यूपीसह जेथे-जेथे भाजप सत्तेत आहे, तेथे-तेथे अराजक निर्माण झाले आहे. आम्ही अभिषेक बॅनर्जी आणि त्रिपुरातील कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो.

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच? संशयास्पद अवस्थेत आढळले भाजपच्या दोन कार्यकर्त्यांचे मृतदेह

ममता म्हणाल्या, या हल्ल्यात सुदीप आणि जया जखमी झाले आहेत. ते विद्यार्थी असून त्रिपुराला गेले होते. त्याच्या डोक्याला मार लागला आहे. दुःखद गोष्ट म्हणजे, पोलीस उपस्थित असताना हा हाल्ला झाला. यानंतर कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सुविधाही देण्यात आली नाही. उलट त्यांनाच अटक करण्यात आली. एवढेच नाही, तर त्यांना एक ग्लास पाणीही दिले गेले नाही.

भाजपवर हल्ला चढवताना ममता म्हणाल्या, या हिंसक घटनेनंतरही मी मागे हटणार नाही. जेथे भाजपची सत्ता आहे तेथे टीएमसीच्या कार्यकर्त्यांवर दिवसाढवळ्या हल्ले केले जात आहेत. यानंतरही पोलीस आणि प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही.

...तर वीज महाग होईल; कंपन्या नफा कमावतील; नव्या वीज विधेयकाविरोधात ममतांनी दंड थोपटला

त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांची हिम्मत नाही, अमित शहाच करत आहेत हल्ले -मुख्यमंत्री ममता म्हणाल्या, 'केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सक्रिय पाठिंब्याशिवाय, असे हल्ले शक्य नाहीत. त्रिपुरा पोलिसांच्या उपस्थितीत झालेल्या या हल्ल्यामागे तेच आहेत आणि त्रिपुरा पोलीस फक्त बघत राहिले. त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांमध्ये, असे हल्ले करण्याची क्षमता नाही. त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक यांच्या ताफ्यावर काठ्यांसह काही लोकांनी हल्ला केला होता. आता, हे हल्ला करणारे लोक भाजपचेच कार्यकर्ते होते, असा आरोप टीएमसीने केला आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAmit Shahअमित शहाwest bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेसTripuraत्रिपुराBJPभाजपा