शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 14:23 IST

Bhagwant Mann : पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील पाणीवादादरम्यान रविवारी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राजस्थानसाठी अतिरिक्त पाणी सोडण्याची मोठी घोषणा केली.

पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधीलपाणीवादादरम्यान रविवारी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राजस्थानसाठी अतिरिक्त पाणी सोडण्याची मोठी घोषणा केली. जेणेकरून राजस्थानमध्ये सैन्याच्या गरजा पूर्ण करता येतील.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या हवाल्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, राजस्थान सरकारने पंजाबच्या कोट्यामधून जास्त पाणी मागितलं आहे, कारण राजस्थान सीमेवर तैनात असलेल्या सैन्याला अतिरिक्त पाण्याची आवश्यकता आहे.

सैन्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पाणी सोडलं - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न येतो तेव्हा पंजाब कधीही मागे राहत नाही.  फक्त पाणीच नाही तर पंजाब राष्ट्रीय हितासाठी आपलं रक्तही सांडू शकतो. सैन्यातील जवानांच्या गरजा लक्षात घेऊन राजस्थानला तात्काळ अतिरिक्त पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत.

४,५०० क्युसेक अतिरिक्त पाण्याची मागणी

हरियाणा सरकारने उष्णतेमुळे ४,५०० क्युसेक अतिरिक्त पाण्याची मागणी केली होती. यावर पंजाब सरकारने म्हटलं होतं की, हरियाणाने आधीच आपल्या कोट्याचं पाणी घेतलं आहे. पंजाब सरकारने हरियाणाला एक थेंबही अतिरिक्त पाणी देण्यास नकार दिला होता.

हा वाद इतका गंभीर झाला की, भाखरा नांगल येथे पंजाब पोलिसांना तैनात करण्यात आले. केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर काही दिवसांपूर्वी भाखरा नांगल बोर्डाची बैठक झाली. पंजाब सरकारच्या अनिच्छेला न जुमानता बोर्ड बैठकीत हरियाणाला ४५०० क्युसेक अतिरिक्त पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानPunjabपंजाबRajasthanराजस्थानWaterपाणीIndian Armyभारतीय जवानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर