शहरं
Join us  
Trending Stories
1
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
2
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
3
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
4
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
5
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
6
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
7
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
8
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
9
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
10
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
11
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
13
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
14
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
15
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
16
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
17
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
18
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
19
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
20
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?

क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 19:37 IST

भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांचा प्रोटोकॉलचा मुद्दा सध्या चर्चेत आहे.

CJI BR Gavai : भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचे पालन न केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. पण, आता त्यांनी स्वतः हा मुद्दा इथेच थांबवण्याचे आवाहन केले आहे. 'क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्त्व देऊ नका. याबद्दल खेद व्यक्त करण्यात आला, आता हे प्रकरण बंद करा,' असे त्यांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये ही माहिती देण्यात आली.

काय आहे प्रोटोकॉल वाद?महाराष्ट्राचे रहिवासी असलेले न्यायमूर्ती गवई रविवारी(दि. 18) एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईत आले होते. यावेळी मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि मुंबई पोलिस आयुक्तांसह राज्याचे प्रमुख अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली, ज्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. प्रोटोकॉलचे पालन न करण्याच्या मुद्द्यावर माध्यमांमध्येही जोरदार चर्चा होऊ लागली. 

देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीदेखील सरन्यायाधीश गवई यांच्या विचारांचे समर्थन केले आणि प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या फोटोंजवळ उपराष्ट्रपतींचा फोटो नसतो, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. 

सरन्यायाधीश गवई काय म्हणाले?वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल सरन्यायाधीश गवई यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले, 'जेव्हा एखाद्या संवैधानिक संस्थेचे प्रमुख पहिल्यांदाच एखाद्या राज्याला भेट देतात, तेव्हा त्यांचे स्वागत कसे करायचे, याचा विचार केला पाहिजे. या गोष्टी क्षुल्लक वाटू शकतात, पण त्याचे महत्त्व कमी लेखता येणार नाही. न्यायपालिका, कार्यकारी आणि कायदेमंडळ हे संविधानाचे समान अंग आहेत. प्रत्येकाने एकमेकांना योग्य आदर दाखवणे महत्वाचे आहे,' असे गवई म्हणाले होते.

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्र