शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

Pulwama Attack: पुन्हा 'ती' चूक नाही होणार; पुलवामासारखा अनर्थ टळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 6:11 PM

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली माहिती

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानं देश हादरला आहे. सीआरपीएफच्या 38 जवानांना अवंतीपुरामध्ये वीरमरण आल्यानं संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर हा संताप आणखी वाढला. पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली.  मात्र त्याचवेळी, गुप्तचर यंत्रणेकडून 'हाय अ‍ॅलर्ट' जारी करण्यात आला असतानाही, सुरक्षा यंत्रणा इतकी गाफील का आणि कशी राहिली?, अशी शंका अनेकांच्या मनात आहे. अडीच हजार जवानांचा ताफा येत असताना यंत्रणा सतर्क का नव्हती?, स्फोटकांनी भरलेली गाडी या रस्त्यावर आलीच कशी?, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. गुप्तचर यंत्रणेच्या इशाऱ्यानुसार, सीआरपीएफचा ताफा ज्या रस्त्याने जाणार होता, तिथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु, जम्मू-श्रीनगर महामार्गावरील एका भागातून स्थानिकांच्या वाहनांना वाहतुकीची परवानगी देणं घातक ठरलं, अशी माहिती सीआरपीएफचे महानिरीक्षक (ऑपरेशन्स) कश्मीर जुल्फिकार हसन यांनी दिली. अडीच हजार जवानांचा ताफा जाण्यासाठी बराच वेळ लागणार होता. त्यामुळे स्थानिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून ही परवानगी देण्यात आली होती. मात्र हीच चूक सीआरपीएफच्या जवानांच्या जीवावर बेतली. त्यामुळे आता ही चूक सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी याबद्दलची माहिती दिली. 'काल सीआरपीएच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला झाला. त्यामुळे यापुढे जेव्हा सुरक्षा दलांचा मोठा ताफा जाईल, त्यावेळी त्या रस्त्यावरील इतर वाहनांची वाहतूक रोखण्यात येईल. यामुळे स्थानिकांना थोडा त्रास होईल. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत,' असं राजनाथ सिंह म्हणाले. हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना अधिकाधिक मदत करण्यात यावी, अशी विनंती राज्य सरकारांकडे करण्यात आल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. सीआरपीएफच्या जवानांना आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम झालेला नाही. दहशतवादाविरोधातील कारवाई शेवटपर्यंत सुरुच राहील, असं राजनाथ यांनी स्पष्ट केलं. सीआरपीएफचा ताफा जम्मू-श्रीनगर महामार्गावरुन जात असताना एका भागातून स्थानिकांच्या वाहनांना वाहतुकीसाठी देण्यात आलेली परवानगी जवानांच्या जीवावर बेतली. ताफा जाण्याआधी रोड ओपनिंग पार्टीनं गुरुवारी सकाळी संपूर्ण रस्त्याची पाहणी केली होती. या मार्गावर कुठेही स्फोटकं सापडली नव्हती. तसंच, जवानांच्या ताफ्यावर गोळीबार होऊ नये, हँड ग्रेनेड फेकली जाऊ नयेत, यादृष्टीनंही पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती, असं त्यांनी स्पष्ट केलं. परंतु, काश्मिरी नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून महामार्गाच्या एका भागातून त्यांच्या गाड्या नेण्यास संमती देण्यात आली होती. मात्र याचा गैरफायदा घेत जैश-ए-मोहम्मदचा आत्मघाती दहशतवादी आदिल अहमद सर्व्हिस रोडवरून राजमार्गावर आला आणि अघटित घडलं. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाRajnath Singhराजनाथ सिंहJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानJaish e Mohammadजैश ए मोहम्मद