शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

NDA मध्ये होणार चिराग पासवान यांची एन्ट्री, मंत्रिपदही मिळणार, मोदी सरकारला फायदा काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 13:36 IST

Chirag Paswan, BJP: जवळपास तीन वर्षांनी चिराग पुन्हा एनडीएमध्ये येण्याच्या तयारीत

Chirag Paswan, BJP: २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाला बिहारमध्ये आपली पकड मजबूत करायची आहे आणि त्यासाठी लोक जनशक्ती पार्टी (एलजेपी, रामविलास) नेते चिराग पासवान यांच्याशी भाजपची जवळीक वाढत आहे. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील चिराग पासवान यांचा प्रवेश निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. त्यांना केंद्रात मंत्री बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे चिराग पासवान लवकरच NDAचा भाग होणार असल्याचा दावाही पक्षाच्या सूत्रांनी केला आहे. याचा मोदी सरकारला काय फायदा होईल, याबाबत जाणून घेऊया.

संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होणार आहे. NDA मध्ये पुनरागमन करण्यासाठी चिराग पासवान यांची भाजपसोबतची चर्चा महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी पटना येथे चिराग यांची भेट घेतल्याच्या एका दिवसानंतर, लोजपचे बिहार अध्यक्ष (रामविलास) राजू तिवारी म्हणाले की चिराग यांना मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती. त्यांनी टीओआयला सांगितले की पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत पक्षासाठी जागा वाटपाच्या व्यवस्थेसाठीही चर्चा झाली आहे. ते म्हणाले की LJP (RV) ला बिहारमध्ये हाजीपूरसह लोकसभेच्या सहा आणि राज्यसभेची एक जागा हवी आहे. दोन्ही पक्षांमध्ये एकमत होण्यापूर्वी चिराग भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता असल्याचेही सांगितले जात आहे

हाजीपूर कोणाचे?

जून 2021 मध्ये एलजेपीच्या 6 पैकी 5 लोकसभा खासदारांना सोबत घेऊन पक्षात फूट पाडणारे चिरागचे काका पशुपती कुमार पारस त्यांच्या मार्गातील अडचण बनू शकतात. कारण हाजीपूर जागेवर दोन्ही गटांचा दावा आहे. पक्षाचे संस्थापक दिवंगत रामविलास पासवान यांनी याच जागेचे अनेकदा प्रतिनिधित्व केले होते. पारस आता लोकसभेत हाजीपूरचे प्रतिनिधीत्व करतात पण चिराग यांना या मतदारसंघाशी संबंधित त्यांच्या वडिलांचा वारसा जपायचा आहे. भाजप पारस यांना कसे सामावून घेईल हे पाहायचे आहे. कारण मुख्यमंत्री नितीश कुमार NDAमध्ये असताना पारस यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता.

नितीश यांनी पारसना मदत केली होती!

जदयूच्या अनेक आमदारांच्या पराभवात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या चिराग यांना नितीश कुमार यांना धडा शिकवायचा होता. चिराग यांनी JDU उमेदवारां विरुद्ध अनेक बंडखोर नेत्यांना उभे केले आणि 2020 च्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमारांचे मोठे नुकसान झाले. नितीश आता महाआघाडी सरकारचे नेतृत्व करत असल्याने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशातील बिगर-भाजप पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत असल्याने, JDU नेत्याचा मुकाबला करण्यासाठी भाजपला बिहारमध्ये चिराग यांच्यासारख्या ठाम आणि तरुण नेत्याची गरज आहे.

भाजपला काय फायदा होणार?

राज्यातील तीन विधानसभा जागांसाठी नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपचा प्रचार केला असला तरी, सर्व काही ठीक झाल्यास चिराग जवळपास तीन वर्षांनंतर NDA मध्ये परत येईल. भाजपने तीन पैकी दोन जागा जिंकल्या होत्या. चिरागचे एनडीएमध्ये परतणे बिहारमधील 4% पासवान मतांवर आघाडी मजबूत करण्यास मदतीचे ठरेल. पासवान हे राज्यातील दलित समाजातील आक्रमक चेहरा आहेत आणि त्यांमुळे त्याचा भाजपाला मोठा फायदा मिळू शकतो.

टॅग्स :BiharबिहारBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदी