शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

भारतासमोर चीन अन् पाकिस्तान टिकणार नाहीत! अमेरिकन F-35, रशियन Su-57 पेक्षाही मजबूत लढाऊ विमाने बनवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 14:23 IST

भारत आता आपल्या हवाई दलाला बळकट करण्यासाठी स्वतःच्या निर्मित लढाऊ विमानांवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे.

भारत आता स्वत: लढाऊ विमाने बनवण्यासाठी मोठी तयारी करत आहे. जगातील काही देशांनी आधीच चौथ्या आणि पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने तयार केली आहेत. यापैकी अमेरिकेच्या एफ-३५ ची सर्वाधिक चर्चा झाली आहे. याशिवाय रशियाचे एसयू-५७ आणि अमेरिकेचे एफ-२१ देखील प्रसिद्ध आहेत.

भारत यापैकी एक जेट विमान देखील खरेदी करू करणार आहे, अशी चर्चा होती. पण आता भारत या परदेशी विमानांपेक्षा आपल्या स्वदेशी लढाऊ विमानांवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे.

"कुराण आन्...!" NIA कोठडीत दहशतवादी तहव्वुर राणानं मागितल्या या तीन गोष्टी

मल्टीरोल फायटर एअरक्राफ्ट प्रकल्पांतर्गत भारताने यापूर्वी ११४ नवीन लढाऊ विमाने खरेदी करण्याचा प्लॅन केला होता. या योजनेत F-35, Su-57, F-21, ग्रिपेन, राफेल, युरोफायटर टायफून आणि F-15EX सारख्या परदेशी लढाऊ विमानांचा समावेश होता. पण ही योजना अनेक वर्षांपासून रखडली आहे आणि त्यात खूप विलंब होत आहे. यामुळे आता परदेशी विमानांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या देशात बनवलेल्या विमानांमध्ये सुधारणा करेल आणि त्यांना प्राधान्य देईल.

भारतीय हवाई दलाकडे ३१ लढाऊ स्क्वॉड्रन आहेत तर ४२.५ स्क्वॉड्रनची आवश्यकता आहे. जुनी मिग-२१ विमाने हळूहळू काढून टाकली जात आहेत. त्यामुळे, हवाई दल मजबूत ठेवण्यासाठी, भारत आता आपल्या स्वदेशी लढाऊ विमानांवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे.

लढाऊ शस्त्रे बनवण्यासाठी प्राधान्य

भारत सरकार आणि संरक्षण मंत्रालयाने 'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक इन इंडिया' अंतर्गत देशात शस्त्रे आणि लढाऊ विमानांच्या निर्मितीला प्राधान्य दिले आहे. याअंतर्गत, भारत आता त्याच्या दोन स्वदेशी लढाऊ विमान प्रकल्पांवर अधिक लक्ष केंद्रित करेल. पहिला म्हणजे पाचव्या पिढीतील AMCA लढाऊ विमान आणि दुसरा म्हणजे चौथ्या पिढीतील तेजस Mk-2, भारतीय हवाई दल अधिक मजबूत व्हावे आणि इतर देशांवरील अवलंबित्व कमी व्हावे यासाठी सरकार या दोन्ही लढाऊ विमानांची संख्या वाढवण्याची योजना आखत आहे.

टॅग्स :airforceहवाईदलIndiaभारत