शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

चेन्नईत पाणीटंचाईचा आयटी कंपन्यांना फटका; कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याचे दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 12:57 PM

मागील अनेक दिवसांपासून चेन्नईमध्ये पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावं लागत आहे. यंदाही समाधानकारक पाऊस झाला नाही तर चेन्नईवर पाणीटंचाईचं संकट उभं राहणार आहे

 चेन्नई - पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने चेन्नई येथील आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ऑफिसमध्ये पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांनी ऑफिसला न येता त्यांना शक्य होईल अशा ठिकाणाहून काम करावं असं सांगण्यात आलं आहे. 

सध्या चेन्नई शहराला भीषण पाणीटंचाईला सामोरं जावं लागत आहे. अनेक भागात टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पैसे देऊनही पाणी मिळेल याची खात्री नाही. चेन्नई शहराची लोकसंख्या कोट्यावधीच्या घरात आहे. मागील अनेक दिवसांपासून चेन्नईमध्ये पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावं लागत आहे. यंदाही समाधानकारक पाऊस झाला नाही तर चेन्नईवर पाणीटंचाईचं संकट उभं राहणार आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 12 कंपन्यातील 5 हजार कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. चार वर्षापूर्वी खाजगी टँकरने संप पुकारला होता त्यावेळी आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगितले होते. चेन्नईच्या ओएमआरमध्ये अनेक आयटी कंपन्या आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग काम करतात. त्यामुळे पाण्याचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. जवळपास 55 टक्के पाण्याचा वापर आयटी कंपन्यातील कर्मचारी वर्ग करतात. साधारणपणे 3 कोटी लीटर पाणी खर्च केले जाते.   

चेन्नईला मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र पावसाचे पाणी साठवण्याबाबत राज्य सरकार उदासीन आहे. चेन्नईत उपलब्ध असलेल्या स्त्रोतांपेक्षा शेकडो पटींनी लोकसंख्या वाढली. इमारती उभ्या राहिला. आयटी कंपन्या आल्या. चेन्नईची भौगोलिक अवस्था पाहिली तर साऊथ वेस्ट मान्सून आणि नॉर्थ ईस्ट मान्सून अशा दोन मोसमात पाऊस पडतो.  पण गेल्यावर्षी पावसाने चेन्नई आणि एकूणच तामिळनाडूला दगा दिला. एप्रिल-मे महिन्यात परिस्थिती इतकी कठीण झाली की टँकरशिवाय पर्याय उरला नाही.

पाणी जपून वापरण्यासाठी अनेक संदेश आयटी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना दिले जातात. पाण्याची जितकी गरज असेल तितकाच उपयोग करावा. आयटी कंपन्यांना पाण्याचे पुरवठा करणारे टॅँकरही उपलब्ध होताना अडचण होत आहे त्यामुळे पाणीटंचाईचा फटका चेन्नईमधील अनेक कंपन्यांना बसला आहे.  

टॅग्स :Chennaiचेन्नईwater scarcityपाणी टंचाई