शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आता Indian Army'च्या वाहनांमध्ये होणार मोठा बदल! वापरणार 'या' खास गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 5:14 PM

देशात इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे महागाई वाढतच आहे. आता महागाईचा परिणाम भारतीय लष्करावरही झाला असल्याचे दिसत आहे.

नवी दिल्ली: देशात इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे महागाई वाढतच आहे. आता महागाईचा परिणाम भारतीय लष्करावरही झाला असल्याचे दिसत आहे. भारतीय लष्करातील वाहनांच्या इंधनाचा खर्च वाढत आहे, तो कमी करण्यासाठी आता प्रयत्न सुरू असून,  आता भारतीय लष्करामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश होणार आहे. 

सुरुवातीला काहीच ठिकाणी इलेक्ट्रिक वाहने वापरण्यात येणार असून, त्यानमतर वाहने वाढवली जाणार आहेत. काही युनिटमध्ये २५ टक्के वाहने यात अधिकाऱ्यांच्या कार, जीप्सी तर ३८ टक्के बस आणि ४८ टक्के मोटार सायकलांना इलेक्ट्रिकमध्ये बदलण्यात येणार आहे. यासह या वाहनांना चर्जिंग करण्यासाठी सुविधा देण्यात येणार आहे, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

भारतीय लष्करामध्ये इंधनाचा खर्च वाढत होता. त्यामुळे या संदर्भात गेल्या अनेक दिवसापासून विचार सुरू होता. एप्रिल २०२२ मध्येही या संदर्भात चर्चा सुरू झाल्या होत्या. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तत्कालीन सेना प्रमुख जनरल एमएस नरवणे आणि अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या होत्या. यावेळी वाहन कंपन्यांनी आपल्या वाहने सादर केली होती. यात टाटा मोटर्स, रिवोल्ट मोटर्स या कंपन्यांचा समावेश होता. 

 

Pawan Hans privatisation: आणखी एका सरकारी कंपनीची होणार विक्री, सरकार लवकरच घेणार निर्णय...

जनरल नरवणे यांनी यासाठी लष्करांच्या अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली होती. या समितीने लष्करी गरजांच्या आधारे इलेक्ट्रिक वाहनांच्या उपयुक्ततेची तपासणी करून या मंडळाने आपल्या शिफारसी सादर केल्या  होत्या. 

या समितीने सुरूवातीला तीन कॅटेगीरीमध्ये वाहने खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. या तीन कॅटेगीरीमध्ये हलके वाहन, बस आणि मोटर सायकल होत्या. आता या तीनही कॅटेगीरीमधील वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर