शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

२८ वर्षांनी पुन्हा नायडूच किंगमेकर! 'त्या' वेळी देवेगौडा-गुजराल यांना बनवलं होतं PM

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 16:12 IST

loksabha Election Result - यंदाच्या लोकसभेत भाजपाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने एनडीएच्या घटक पक्षांच्या भूमिकेवर सरकारचं अस्तित्व टिकून आहे. त्यामुळे एनडीएतील चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे दोघे किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालात अर्धवट जनादेशामुळे भाजपाला दिल्लीच्या सत्तेवर मजबुतीनं उभं राहण्याची स्थिती नाही. २०१४ आणि २०१९ या काळात भाजपाला एकट्याला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. मात्र यंदा भाजपा बहुमतापासून ३२ पाऊले दूर आहे. भाजपाला लोकसभेत सर्वाधिक २४० जागा मिळाल्यात परंतु त्यांना स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यामुळे २ दशकानंतर केंद्रातील सत्तेच्या खुर्चीवर बसणाऱ्या नेत्यांना प्रादेशिक पक्षांवर नजर ठेवावी लागत आहे. २०२४ च्या निकालानंतर सर्वांचं लक्ष नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर केंद्रीत आहे.

चंद्राबाबू नायडू हे पहिल्यांदाच किंगमेकर झालेत असं नाही. अभिनेता ते नेता बनलेल्या नायडू यांनी याआधीही अनेक सरकारच्या स्थापनेत नायकाची भूमिका निभावली आहे. इतकेच नाही तर तेलुगु देशम पार्टीची स्थापना करणारे एन. टी रामाराव ज्यांनी १९८० च्या दशकात राजकीय जीवनात पाऊल ठेवले होते. त्यांनीही १९८९ च्या दिल्लीतील सत्ता स्थापनेत महत्त्वाचं योगदान दिले आहे. 

२ वर्षात ३ पंतप्रधान

१९९६ मध्ये लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेनं पी.वी नरसिम्हा राव यांच्या नेतृत्वातील सरकारला नाकारलं मात्र त्यावेळी इतर कुणालाही स्वीकारलं नव्हतं. तेव्हा भाजपा सर्वाधिक १६१ जागा मिळवून मोठा पक्ष बनला होता. मात्र तो बहुमतापासून बराच लांब होता. तरीही मोठा पक्ष म्हणून तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांच्या निमंत्रणावर अटलबिहारी वाजपेयी यांनी सरकार स्थापनेचा दावा करत पंतप्रधानपदाची शपथ घेतली परंतु अवघ्या १३ दिवसांत हे सरकार कोसळले. वाजपेयी बहुमताचे आकडे न गाठू शकल्याने ते सरकार कोसळले आणि त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. 

त्यानंतर वी.पी सिंह, हरिकिशन सिंह सुरजीत आणि चंद्राबाबू नायडू यांनी मिळून संयुक्त मोर्चा स्थापन केला. ज्यात पहिल्या पंतप्रधानासाठी बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसु यांचे नाव आलं. परंतु काही आपापसातील मतभेदामुळे ते पंतप्रधान बनू शकले नाहीत.

किंगमेकर नायडू! 

त्याचवर्षी किंगमेकर म्हणून पुढे आलेले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभेत १६ जागा जिंकल्या होत्या. नायडू यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी देवेगौडा यांचं नाव पंतप्रधानपदासाठी प्रस्तावित करून भारतीय राजकारणात नव्या नांदीला सुरुवात केली. तोपर्यंत दक्षिण भारतातील कुणीही नेते देशाचा पंतप्रधान झालं नव्हतं. 

नायडू यांच्या भूमिकेमुळे दक्षिण भारताला पंतप्रधानपद मिळालं. काँग्रेसनेही बाहेरून पाठिंबा दिल्याने देवेगौडा देशाचे पंतप्रधान बनले. परंतु त्यांचे सरकार १ वर्षातच कोसळले. सीताराम केसरी यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं त्यांचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर मुलायम सिंह यादव, एस.आर बोम्मई आणि अन्य नेत्यांनी पंतप्रधानपदासाठी दावेदारी सांगितली. परंतु कुठल्याही एका नावावर सहमती बनली नाही तेव्हा लालू प्रसाद यादव यांनी इंद्रकुमार गुजराल यांचे नाव पुढे आणले. त्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी हरिकिशन सिंह सुरजीत यांना एक फोन कॉल केला आणि त्यांनी गुजराल यांच्या नावावर सहमती दर्शवली. त्यामुळे २१ एप्रिल १९९७ रोजी देशात आय.के गुजराल यांच्या रुपाने नवीन पंतप्रधान मिळाले. 

दरम्यान, योगायोग म्हणजे चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीला यंदाच्या लोकसभेतही १६ जागा मिळाल्या आहेत. परंतु इतक्या कमी जागा असूनही ते लोकसभेत किंगमेकर म्हणून पुढे आलेत. निकालानंतर नायडू काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष होते. परंतु एनडीएच्या संसदीय दलाच्या बैठकीत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाला अनुमोदन देत मागील १० वर्षात भारतात फार मोठे बदल पाहायला मिळालेत. अर्थव्यवस्थेत भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनला आहे. देशाची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे असं सांगत मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक करत एनडीएसोबतच राहण्याची भूमिका घेतली. 

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूNarendra Modiनरेंद्र मोदीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीcongressकाँग्रेसlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल