शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

२८ वर्षांनी पुन्हा नायडूच किंगमेकर! 'त्या' वेळी देवेगौडा-गुजराल यांना बनवलं होतं PM

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 16:12 IST

loksabha Election Result - यंदाच्या लोकसभेत भाजपाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने एनडीएच्या घटक पक्षांच्या भूमिकेवर सरकारचं अस्तित्व टिकून आहे. त्यामुळे एनडीएतील चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे दोघे किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालात अर्धवट जनादेशामुळे भाजपाला दिल्लीच्या सत्तेवर मजबुतीनं उभं राहण्याची स्थिती नाही. २०१४ आणि २०१९ या काळात भाजपाला एकट्याला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. मात्र यंदा भाजपा बहुमतापासून ३२ पाऊले दूर आहे. भाजपाला लोकसभेत सर्वाधिक २४० जागा मिळाल्यात परंतु त्यांना स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यामुळे २ दशकानंतर केंद्रातील सत्तेच्या खुर्चीवर बसणाऱ्या नेत्यांना प्रादेशिक पक्षांवर नजर ठेवावी लागत आहे. २०२४ च्या निकालानंतर सर्वांचं लक्ष नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर केंद्रीत आहे.

चंद्राबाबू नायडू हे पहिल्यांदाच किंगमेकर झालेत असं नाही. अभिनेता ते नेता बनलेल्या नायडू यांनी याआधीही अनेक सरकारच्या स्थापनेत नायकाची भूमिका निभावली आहे. इतकेच नाही तर तेलुगु देशम पार्टीची स्थापना करणारे एन. टी रामाराव ज्यांनी १९८० च्या दशकात राजकीय जीवनात पाऊल ठेवले होते. त्यांनीही १९८९ च्या दिल्लीतील सत्ता स्थापनेत महत्त्वाचं योगदान दिले आहे. 

२ वर्षात ३ पंतप्रधान

१९९६ मध्ये लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेनं पी.वी नरसिम्हा राव यांच्या नेतृत्वातील सरकारला नाकारलं मात्र त्यावेळी इतर कुणालाही स्वीकारलं नव्हतं. तेव्हा भाजपा सर्वाधिक १६१ जागा मिळवून मोठा पक्ष बनला होता. मात्र तो बहुमतापासून बराच लांब होता. तरीही मोठा पक्ष म्हणून तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांच्या निमंत्रणावर अटलबिहारी वाजपेयी यांनी सरकार स्थापनेचा दावा करत पंतप्रधानपदाची शपथ घेतली परंतु अवघ्या १३ दिवसांत हे सरकार कोसळले. वाजपेयी बहुमताचे आकडे न गाठू शकल्याने ते सरकार कोसळले आणि त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. 

त्यानंतर वी.पी सिंह, हरिकिशन सिंह सुरजीत आणि चंद्राबाबू नायडू यांनी मिळून संयुक्त मोर्चा स्थापन केला. ज्यात पहिल्या पंतप्रधानासाठी बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसु यांचे नाव आलं. परंतु काही आपापसातील मतभेदामुळे ते पंतप्रधान बनू शकले नाहीत.

किंगमेकर नायडू! 

त्याचवर्षी किंगमेकर म्हणून पुढे आलेले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभेत १६ जागा जिंकल्या होत्या. नायडू यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी देवेगौडा यांचं नाव पंतप्रधानपदासाठी प्रस्तावित करून भारतीय राजकारणात नव्या नांदीला सुरुवात केली. तोपर्यंत दक्षिण भारतातील कुणीही नेते देशाचा पंतप्रधान झालं नव्हतं. 

नायडू यांच्या भूमिकेमुळे दक्षिण भारताला पंतप्रधानपद मिळालं. काँग्रेसनेही बाहेरून पाठिंबा दिल्याने देवेगौडा देशाचे पंतप्रधान बनले. परंतु त्यांचे सरकार १ वर्षातच कोसळले. सीताराम केसरी यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं त्यांचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर मुलायम सिंह यादव, एस.आर बोम्मई आणि अन्य नेत्यांनी पंतप्रधानपदासाठी दावेदारी सांगितली. परंतु कुठल्याही एका नावावर सहमती बनली नाही तेव्हा लालू प्रसाद यादव यांनी इंद्रकुमार गुजराल यांचे नाव पुढे आणले. त्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी हरिकिशन सिंह सुरजीत यांना एक फोन कॉल केला आणि त्यांनी गुजराल यांच्या नावावर सहमती दर्शवली. त्यामुळे २१ एप्रिल १९९७ रोजी देशात आय.के गुजराल यांच्या रुपाने नवीन पंतप्रधान मिळाले. 

दरम्यान, योगायोग म्हणजे चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीला यंदाच्या लोकसभेतही १६ जागा मिळाल्या आहेत. परंतु इतक्या कमी जागा असूनही ते लोकसभेत किंगमेकर म्हणून पुढे आलेत. निकालानंतर नायडू काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष होते. परंतु एनडीएच्या संसदीय दलाच्या बैठकीत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाला अनुमोदन देत मागील १० वर्षात भारतात फार मोठे बदल पाहायला मिळालेत. अर्थव्यवस्थेत भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनला आहे. देशाची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे असं सांगत मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक करत एनडीएसोबतच राहण्याची भूमिका घेतली. 

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूNarendra Modiनरेंद्र मोदीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीcongressकाँग्रेसlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल