शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

केंद्रीय कृषीमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, "कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास तयार, परंतु..." 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 13:16 IST

Farmers Protest : कृषी मंत्र्यांनी साधला विरोधकांवर निशाणा, शनिवारी शेतकरी आंदोलनाला पूर्ण झाले १०० दिवस

ठळक मुद्देकृषी मंत्र्यांनी साधला विरोधकांवर निशाणाशनिवारी शेतकरी आंदोलनाला पूर्ण झाले १०० दिवस

गेल्या अनेक दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत शेतकरी नेते आणि सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या असून यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. शनिवारी पुन्हा एकदा केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी कायद्यांवर टीका करणाऱ्या विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. "जे लोकं याचा विरोध करत आहेत ते याबाबत अधिक माहिती मिळवत नाहीयेत असं दिसतंय. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. आम्ही कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास तयार आहोत. परंतु कृषी कायद्यांमध्ये काही त्रुटी आहेत असं विरोधकांनी म्हणून नये. कारण कृषी कायद्यांमध्ये काय त्रुटी आहेत हे सकारात्मकरित्या सांगण्याच्या स्थितीत विरोधक नाहीत," असं म्हणत तोमर यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असल्या तरी त्यावर सकारात्मक तोडगा निघालेला नाही. या चर्चांमध्ये सरकारचं नेतृत्व कृषीमंत्री तोमर यांनीच केलं होतं. शनिवारी या आंदोलनाला १०० दिवस पूर्ण झाले. त्यानिमित्तानं दिल्लीनजीकचा प्रमुख रस्ता बंद ठेवण्यात आला होता. "चर्चेदरम्यान कायद्यांमध्य काही सुधारणांबाबत वक्तव्य केलं. परंतु या सुधारणांचा अर्थ या कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत असा नाही. या कायद्यात सुधारणांचा प्रस्ताव यासाठी ठेवला जात आहे कारण याच्या विरोधात नेतृत्व करणारा प्रमुख चेहरा शेतकऱ्यांचा आहे," असं तोमर म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधकांनाही धारेवर धरत त्यांच्यावर राजकारण करत असल्याचा आरोप केला. "संसदेतही आम्ही आमचं मत सर्वांच्या समोर ठेवलं. अनेक तास आम्ही दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांची बाजू ऐकली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतरही विरोधीपक्ष नेत्यांनी आंदोलनावरच चर्चा केली. कायद्याबाबत चर्चाच केली नाही," असं त्यांनी नमूद केलं. केवळ आंदोलनाबाबतच चर्चा"विरोधी पक्षाचे नेते प्रत्येक वेळी केवळ आंदोलनावरच चर्चा केली. कृषी कायद्यांबाबत त्यांनी कोणतीही चर्चा कली नाही, ज्याचा शेतकरी विरोध करत आहेत. लोकशाहीत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण राजकारण करण्यासाठी स्वतंत्र आहे. परंतु शेतकऱ्यांचं हित आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवून राजकारण करु नये. जेव्हा कोणताही बदल येतो तेव्हा तो लागू करणं कठिण आहे. काही लोकं त्याचा विरोध करतात. काही लोकांकडून त्याची मजाही केली जाते. जर त्या बदलांमागे उद्देश चांगला असेल तर लोकं तो स्वीकारही करतात," असं तोमर यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Narendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमरFarmers Protestशेतकरी आंदोलनcongressकाँग्रेसBJPभाजपाParliamentसंसदdelhiदिल्ली