शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

मजुरांना रोजगार देण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन, आता शहरातही 'मनरेगा' योजना सुरू करण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 11:33 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेरोजगारीचा सामना करत असलेल्या शहरी भागांतील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार ही योजना शहरी भागांतही सुरू करण्याचा विचार करत आहे. 

ठळक मुद्देमनरेगाची मजुरी वाढवली असून, आता ती 202 रुपये रोज, अशी करण्यात आली आहे.सर्वप्रथम देशातील छोट्या शहरांत योजना सुरू करण्याचा विचारमनरेगा योजनेत मजुराला जास्तीतजास्त 100 दिवसांचा रोजगार देण्याची गॅरंटी दिली जाते. 

नवी दिल्ली - संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतालाही याचा मोठा फटका बसला आहे. अनेकांचा रोजगार बुडाला आहे. तर अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना संकट काळात देशभरात लागू करण्यात आलेल्या  लॉकडाउनमुळे ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागांतील मजुरांनाही बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. मात्र ग्रामीण भागाचा विचार केला, तर तेथील मजुरांना केंद्र सरकारच्या मनरेगा योजनेचा मोठा सहारा मिळाला आहे. यामुळे आता, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेरोजगारीचा सामना करत असलेल्या शहरी भागांतील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार ही योजना शहरी भागांतही सुरू करण्याचा विचार करत आहे. 

सर्वप्रथम देशातील छोट्या शहरांत योजना सुरू करण्याचा विचार -देशातील शहरीभागातही मोठ्या प्रमाणावर मजूर वर्ग राहतो. या मजुरांच्या हाताला लॉकडाउनमुळे काम मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे ही योजना शहरी भागात सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणावर मजुरांच्या हाताला काम मिळेल. माध्यमांतील वृत्तानुसार, सरकार सर्वप्रथम देशातील छोट्या शहरांत ही योजना सुरू करण्याचा विचार करत आहे. कारण छोट्या शहरांतील रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना प्रशिक्षणाची आवश्यकता नसते. या योजनेवर सरकार सुरुवातील 3,5000 कोटी रुपये खर्च करण्याचा विचार करत आहे. या प्लॅनवर सरकार गेल्या वर्षापासूनच काम करत आहे.

...तर देशाच्या अर्थवयवस्थेला गती मिळेल -शहरी भागात मनरेगा योजना सुरू झाल्यास देशाच्या अर्थवयवस्थेला गती मिळेल, असे मत जानकारांनी व्यक्त केले आहे. कारण ऑगस्ट महिन्याचा विचार करता, शहरी भागांतील बेरोजगारी दर 9.83 टक्के नोंदवला गेला आहे. तर ग्रामीण भागांतील बेरोजगारी दर 7.65 टक्के नोंदवला गेला आहे. हाच दर जुलै महिन्यात शहरी भागांत 9.15 टक्के तर ग्रामीण भागांत 6.6 टक्के एवढा नोंदवला गेला होता.

मनरेगाची मजुरी 202 रुपये करणयात आली आहे -केंद्र सरकारच्या वतीने 2020-21च्या अर्थसंकल्पात मनरेगा योजनेसाठी 61,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, कोरोना संकटाचा विचार करता, सरकारने या योजनेसाठी पुन्हा 40 हजार कोटी रुपयांची तरतूद केली. भारत सरकारच्या ग्रामीण मंत्रालयाने मनरेगाची मजुरी वाढवली असून, आता ती 202 रुपये रोज, अशी करण्यात आली आहे. मनरेगा योजनेत मजुराला जास्तीतजास्त 100 दिवसांचा रोजगार देण्याची गॅरंटी दिली जाते. 

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVaccine News : "अखेरच्या टप्प्यात पोहोचल्यानंतर अमेरिकेच्या 4 लशी फेल होण्याची शक्यता"

कोरोना लस तयार व्हायला लागणार उशीर; माकडांच्या तुटवड्यानं संशोधन रखडलं!

शिवसेना नेत्याची गोळी घालून हत्या; पत्नी आणि मुलगीही जखमी

चीनसाठी USचा मास्टर प्लॅन; नाटो सारखीच संघटना तयार करणार भारत, जपान, ऑस्ट्रेलिया

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी