शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार उद्योजकांना नेट विकतेय - राहुल गांधी

By admin | Updated: April 22, 2015 12:44 IST

सोशल मिडीयावर नेट न्यूट्रेलिटीच्या समर्थनार्थ मोहीम सुरु असतानाच केंद्र सरकार उद्योजकांना नेट विकत आहे असा आरोप राहुल गांधी यांनी लोकसभेत केला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि, २२ - सोशल मिडीयावर नेट न्यूट्रेलिटीच्या समर्थनार्थ मोहीम सुरु असतानाच केंद्र सरकार उद्योजकांना नेट विकत आहे असा आरोप राहुल गांधी यांनी लोकसभेत केला आहे. नेट न्यूट्रेलिटीसाठी केंद्र सरकारने विद्यमान कायद्यात बदल करावा किंवा नवीन कायदाच आणावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.  

सध्या सोशल मिडीयावर नेट न्यूट्रेलिटीचा मुद्दा चांगलाच गाजत असून तीन लाखहून अधिक नेटिझन्सनी ट्रायला ईमेल पाठवून नेट न्यूट्रेलिटी अबाधित ठेवण्याची विनंती केली आहे. बुधवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नेट न्यूट्रेलिटीचा मुद्दा लोकसभेत मांडला. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी एका वृत्तपत्रातील लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. यासाठी मोदींचे कौतुक केले पाहिजे असा टोला लगावत राहुल म्हणाले, सोशल मिडीयावर नेट न्यूट्रेलिटीसाठी मोहीम सुरु आहे. पण सरकार नेट उद्योजकांना हाततात देण्याचा प्रयत्न करत आहे.

राहुल गांधींनी हा मुद्दा मांडल्यावर माहिती व सुचना प्रसारण मंत्री  रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजीटल इंडियाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयापर्यंत इंटरनेट पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आमचे उद्योजकांच्या दबावाखाली काम करत नसून ट्रायने शिफारस केली तरी अंतिम निर्णय आम्हीच घेणार आहोत असे त्यांनी लोकसभेत स्पष्ट केले.