शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: बस… आता थांबा, नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवा, सरकारला सहकार्य करा; जरांगेंना कुणाचा सल्ला?
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
5
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
6
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
7
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
8
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
9
"ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
10
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
15
अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...
16
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
17
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
18
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
19
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
20
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

शेतकऱ्यांच्या पिकांना हमी, यंदा मिळणार जास्त भाव; खरीप हंगाम सुरू होण्याआधीच केंद्र सरकारने दिली गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 10:14 IST

अनेक पिकांची एमएसपी वाढवली; स्वस्तातील कर्जही मिळणार

नवी दिल्ली : एकीकडे मे महिन्यातच मान्सूनचे आगमन झाल्याने सुखावलेल्या बळीराजाला केंद्र सरकारनेही गुड न्यूज दिली आहे. अनेक पिकांच्या एमएसपीमध्ये म्हणजेच आधारभूत किमतींत वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला असून, त्यामुळे यंदा शेतमालाला गेल्या वर्षीपेक्षा अधिक भाव मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारावरील मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत नव्या खरीप हंगामासाठी किमान आधारभूत किमतीसंबंधी कृषी मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. बैठकीनंतर माध्यमांना माहिती देताना माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी खरीप हंगामातील पिकांसाठी एमएसपी वाढ आणि व्याज अनुदान योजना सुरू ठेवणे, हे दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. गेल्या १०-११ वर्षांत १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे.

उत्पादनखर्चाच्या तुलनेत दीडपट हमीभाव शेतकऱ्यांना देण्याचे सरकारने २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात सांगितले होते. त्याच धर्तीवर हमीभावातील ही वाढ करण्यात आली आहे. उत्पादनखर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना मिळणारा अपेक्षित नफा ५० टक्क्यांच्याही वर असल्याचेही वैष्णव यांनी सांगितले. सर्वाधिक नफा बाजरीसाठी (६३%) असून, त्यानंतर मका (५९ %), तूर (५९%) आणि उडीद (५३ %) यांचा क्रम लागतो.

वर्धा-बल्लारशा रेल्वेमार्गाला मंजुरी

मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वेच्या दोन मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यात महाराष्ट्रातील  वर्धा-बल्लारशादरम्यान चौथ्या आणि रतलाम-नागदा दरम्यानचा तिसरा रेल्वेमार्गाचा समावेश आहे. दोन्ही रेल्वेमार्गांचा एकूण अंदाजे खर्च ३ हजार ३९९ कोटी रुपये आहे. हे प्रकल्प २०२९-३० पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यामुळे १७६ किलोमीटरने रेल्वे नेटवर्क वाढणार आहे. हे प्रकल्प मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या चार जिल्ह्यांमधून जातील. याचा थेट फायदा ७८४ गावांतील १९.७४ लाख लोकांना होईल. ग्रामीण भागांची कनेक्टिव्हिटी सुधारल्याने शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि व्यवसायाच्या संधी वाढतील. तसेच, दरवर्षी सुमारे १८.४० दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक शक्य होईल.

शेतकऱ्यांसाठी व्याज अनुदान योजना कायम

शेतकऱ्यांसाठी २०२५-२६  वर्षासाठी सुधारित व्याज अनुदान योजना सुरू ठेवण्यास मंजुरी दिली. याअंतर्गत किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त दराने अल्पकालीन कर्ज उपलब्ध होणार आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर १५,६४० कोटी रुपयांचा भार पडेल. याअंतर्गत शेतकऱ्यांना कमी व्याजाने तीन लाखांपर्यंतचे कर्ज देण्यात येते. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरी