शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
2
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
3
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
4
जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
5
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
6
वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात धमाका; बिहारमध्ये गेल्यावर बॅटला लागलं 'ग्रहण'
7
खळबळजनक! 'तो' वाद टोकाला गेला, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच विवाहितेसोबत घडलं भयंकर
8
'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
SIP ला लावा 'टॉप-अप'चा बुस्टर! दरवर्षी रक्कम वाढवा आणि तुमचं आर्थिक लक्ष्य वेळेआधी पूर्ण करा!
10
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक, समायोजन स्थगित; आता २०२५-२६ च्या संचमान्यतेनंतरच प्रक्रिया
11
हनिमूनच्या रात्री नवरी फक्त 'हे' म्हणाली, नवरदेव निघून गेला अन् परतलाच नाही; नेमकं काय घडलं?
12
नोकरी करणं गरज नाही तर केवळ छंद राहिल; Nikhil Kamath यांच्या पॉडकॉस्ट मध्ये Elon Musk यांची भविष्यवाणी
13
निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगावर टीका
14
स्मृती मंधानाला चीट केल्याची चर्चा, लग्नही पुढे ढकललं; सर्व प्रकारानंतर पलाश मुच्छल पहिल्यांदाच दिसला
15
चायनामन कुलदीपची कमाल! शेन वॉर्नचा २३ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास
16
समांथा रुथ प्रभूने गुपचुप केलं दुसरं लग्न? 'द फॅमिली मॅन'च्या दिग्दर्शकासोबत संसार थाटल्याच्या चर्चा
17
वरमाला झाली, वधू स्टेजवरून उतरली... अन् थेट प्रियकरासोबत पळून गेली! सप्तपदीपूर्वीच लग्नात मोठा राडा
18
तंबाखू-सिगारेट महागणार तर विमा होणार स्वस्त! ९ मोठी आर्थिक विधेयकं संसदेत मांडली जाणार
19
भयंकर! विधवा सून बॉयफ्रेंडसह दिसली शेतात; संतापलेल्या सासऱ्याने दोघांना बांधलं अन् लावली आग
20
हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राचा प्रचंड दबाव....जोड...

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

नाशिक- नगर- मराठवाड्यास देण्याची आवश्यकता आहे.

नाशिक- नगर- मराठवाड्यास देण्याची आवश्यकता आहे.
गिरणेचे भविष्य अंधारात
पार- तापी- नर्मदा लिंकमार्फत नार- पार खोर्‍यातील ३२ टीएमसी पाणी गुजरातमधील कच्छ- सौराष्ट्रास नेण्याचे नियोजन आहे. एनडब्ल्यूडीएने नार- पार- गिरणा घाटी लिंक प्रस्ताव तयार करून १९ टीएमसी पाणी गिरणा खोर्‍यात वळविण्याचे नियोजन केले होते; परंतु आता १० टीएमसी पाणी नार- पार खोर्‍यातून, तर उर्वरित २२ टीएमसी पाणी तापी खोर्‍यातून द्यावे, असे पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांनी कळविले आहे. दमनगंगा खोर्‍यातील ५४ टीएमसी पाणी व नार-पार खोर्‍यातील ३२ टीएमसी पाणी गुजरातमध्ये नेण्याचा डाव पद्धतशीरपणे आखण्यात आला आहे. याव्यतिरिक्त तापीतील अतिरिक्त जलसंपत्ती नर्मदेत टाकण्याचे नियोजन आहे. केंद्रामार्फत त्यासाठी महाराष्ट्रावर प्रचंड दबाव टाकण्यात येत आहे. महाराष्ट्राच्याच हद्दीतील पाणी महाराष्ट्राला वापरण्यासाठी बंदी येत आहे.
गोदावरी खोरे तुटीचे
वास्तविक गोदावरी खोरे तुटीचे असून त्याचे क्षेत्रफळ १४४ लाख हेक्टर इतके आहे व ते महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्राच्या ५० टक्के आहे. जायकवाडी धरणाच्या पाण्यावरून नाशिक- नगर- मराठवाडा, असा संघर्ष उभा राहिला आहे. त्यासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठाविण्यात येत आहेत. उपलब्ध असलेल्या पेलाभर पाण्यात सर्वांचे भागणार नाही व त्याचे लोटाभर पाणी कसे होईल, याचा विचार या भागातील लोकप्रतिनिधी व जलसंपदा खात्याने करणे आवश्यक आहे. गिरणा खोर्‍यातही तशीच परिस्थिती आहे. सद्य:स्थितीत कालव्याद्वारे पाणी मिळणारे शेतकरी एकमेकांशी भांडत आहेत, तर कायमस्वरूपी दुष्काळी तालुक्यांना पाणी देण्याचे कोणतेही नियोजन नाही. त्यासाठी दमनगंगेचे पाणी हा एकमेव पर्याय गोदावरी खोर्‍यास तर नार- पारच्या पाण्याचा पर्याय गिरणा खोर्‍यास उपलब्ध आहे.
दमनगंगा- पिंजार व पार- तापी- नर्मदा या दोन लिंकसंदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारने तातडीने जलसंपदा खात्याचे निवृत्त सचिव व जलतज्ज्ञांची समिती नेमावी व या समितीने दमनगंगा- नार- पार, उल्हास- वैतरणा व गोदावरी- गिरणा या खोर्‍यांचा तांत्रिक अभ्यास करून उपलब्ध पाण्याचा विनियोग कसा करावा याचे मार्गदर्शन करावे, असा आग्रह आता जाणकारांतून वाढत आहे. तसेच महाराष्ट्राच्या हद्दीतील पाणी गुजरातला देण्याच्या विरोधात नाशिक- नगर- मराठवाड्यातील शेतकर्‍यांचे मोठे जनांदोलन उभारावे लागेल, असे इशारे आता देण्यात येत आहेत. भविष्यात पाण्याचा हा प्रश्न पेटल्याशिवाय राहणार नाही, असे दिसते.