शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

केंद्राने १२०० कोटींचा निधी राज्याला द्यावा; मुख्यमंत्र्यांची अमित शाहंकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 7:32 AM

नक्षलग्रस्त भागाचा निर्धार.

ठळक मुद्देनक्षलग्रस्त भागाचा निर्धार.

विकास झाडेनवी दिल्ली : नक्षलग्रस्त भागात विकासाला गती मिळण्यासाठी केंद्र सरकारने या परिसरात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी १२०० कोटींच्या निधीची मदत करावी, वडसा देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्ग निर्मितीसाठीचा ५० टक्के निधी केंद्राने उपलब्ध करून द्यावा, नक्षल प्रभावित भागांतील रस्ते व पूल बांधकाम प्रकल्पांना मंजुरी मिळावी. या भागातील लोकोपयोगी कामांसाठी वन अधिनियमांतर्गत पुढचे तीन वर्षांसाठी मुदत वाढ मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी बैठकीत केली.

नक्षलवादाच्या समस्येला तोंड देणाऱ्या देशातील १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी विज्ञान भवनात आढावा बैठक घेतली. नक्षलग्रस्त भागात रस्ते, पूल, शाळा आणि आरोग्य केंद्रे बांधणे यासारख्या विकास कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. देशात माओवाद्यांचा हिंसाचार कमी झाला असला तरी अद्यापही ४५ जिल्ह्यांमध्ये प्रभाव आहे. देशात एकूण ९० जिल्हे आहेत जे नक्षलवादाने प्रभावित मानले जातात. हे जिल्हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सुरक्षा संबंधित खर्च योजनेंतर्गत येतात. २०१९ मध्ये ६१ जिल्ह्यांमध्ये नक्षलवादी हिंसा नोंदवण्यात आली होती, त्यानंतर २०२० मध्ये ही संख्या कमी होऊन ४५ झाली आहे. गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, वर्ष २०१५ ते वर्ष २०२० पर्यंत नक्षलग्रस्त भागात हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये सुमारे ३८० सुरक्षा कर्मचारी, एक हजार नागरिक आणि ९०० नक्षलवादी ठार झाले. यासह, याच कालावधीत एकूण ४२०० नक्षलवादीदेखील शरण आले.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या विषयांकडे लक्ष वेधले. नक्षलग्रस्त भागात पर्यटन क्षेत्राचा विकास करून नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे, या भागात विमान सेवा सुरू करणे. लोकांच्या मनातली भीती दूर करणे, प्रशासन लोकाभिमुख करणे आणि भ्रष्टाचार थांबविणे. महाराष्ट्र पोलीस नक्षलवादी चळवळ हाताळण्यात यशस्वी झाले आहेत. परिणामी, राज्यात नक्षलवाद्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून फक्त १३९ नक्षलवादी सक्रिय आहेत. राज्यातील ४० टक्क्यांपेक्षा अधिक नक्षलवादी हे शेजारील छत्तीसगढ राज्यातून येतात. नक्षलवाद आटोक्यात आणण्यासाठी सुरक्षेबरोबरच विकास कामे, शिक्षण, दळणवळणाला भर दिल्याशिवाय तेथील स्थानिकांना मुख्य प्रवाहाशी जोडणे शक्य होणार नाही.

नक्षलग्रस्त भागात रस्ते बांधकामाचे १९ प्रकल्प हे वन संवर्धन अधिनियम १९८० प्रमाणे प्रलंबित आहेत. यातील १० प्रस्ताव वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाकडे पाठवण्यात आले आहेत. बाकी ९ प्रस्ताव पुढील पंधरा दिवसांत केंद्राला पाठविले जाईल. नक्षलग्रस्त भागात ५१२ कि.मी. लांबीचे आणखी ३७ रस्ते आणि ५९ पुलांचा समावेश असलेला अंदाजित खर्च रु. ९८० कोटींचा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. नक्षलग्रस्त जिल्ह्यातील लोकोपयोगी कामांना ४० हे. क्षेत्राच्या मर्यादेत वन (संवर्धन) अधिनियम, १९८० मध्ये मंजूरी देण्याचे अधिकार डिसेंबर २०२० पर्यंत राज्य शासनास देण्यात आले होते. या अधिकारांना केंद्र शासनाने पुढील तीन वर्षांसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

५० एकलव्य निवासी शाळांची मागणी

  • राज्यात ५० एकलव्य निवासी शाळा मंजूर करण्याचे विनंती पत्र मागील वर्षी केंद्रीय जनजाती मंत्रालयाकडे पाठविण्यात आले असून यास मंजुरी देण्यात यावी. 
  • सदर ५० शाळांमध्ये एकूण २१ हजार विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील. तसेच, या शाळांसाठी असलेली मंजुरीची अट सुधारित करण्याची मागणीही ठाकरे यांनी केली असल्याचे कळते. 

वडसा देसाईगंज-गडचिरोली रेल्वेसाठी सहकार्य करा

  • वडसा देसाईगंज- गडचिरोली रेल्वे लाइनसाठी एकूण ५२.३६ कि.मी.चा प्रस्ताव मंजूर असून सदर सुधारित अंदाजपत्रक १०९६ कोटी रुपये इतके मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने प्रत्येकी ५० टक्के भार उचलावयाचा आहे. 
  • केंद्राने सहकार्य केल्यास हा प्रकल्प लवकर पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे नक्षलग्रस्त भागातील दळणवळण तसेच विकासकामांना चालना मिळेल याकडेही उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले.
टॅग्स :Amit Shahअमित शाहUddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्रीMaharashtraमहाराष्ट्रnaxaliteनक्षलवादी