शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

लोकसभा निवडणुकीचा आज वाजणार बिगुल; हॅट्ट्रिक करण्यास भाजप सज्ज; विरोधक देणार आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 05:57 IST

सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून हॅट्ट्रिक करण्यासाठी भाजप रिंगणात उतरली आहे, तर विरोधी पक्ष एकजूट होऊन इंडिया आघाडीच्या माध्यमातून भाजपचा विजयी रथ रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत.

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सर्वांत मोठा लोकशाही उत्सव असलेल्या भारतातील लोकसभा निवडणुकीचा बिगुल शनिवारी वाजणार आहे. १६ मार्च रोजी दुपारी तीन वाजता भारतीय निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने ‘एक्स’वर ही माहिती दिली. त्यानंतर देशात आदर्श आचारसंहिता लागू होईल.

लोकसभेच्या ५४३ जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होऊ शकते. याआधीही २०१४ आणि २०१९ मध्ये सात टप्प्यांत मतदान झाले होते. तत्पूर्वी, निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर ज्ञानेश कुमार व सुखबीर सिंग संधू यांनी शुक्रवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासोबत तयारीचा आढावा घेतला. 

सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून हॅट्ट्रिक करण्यासाठी भाजप रिंगणात उतरली आहे, तर विरोधी पक्ष एकजूट होऊन इंडिया आघाडीच्या माध्यमातून भाजपचा विजयी रथ रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत.

अब की बार, ३७० पार

२०१९ मध्ये भाजपने ३०३ जागा जिंकून इतिहास रचला होता. ‘अब की बार, ३७० पार’चा नारा भाजपने यंदा दिला आहे. तर एनडीएसह ४०० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी भाजपने नियोजन आणि तयारीला सुरुवातही केली आहे. अयोध्येत राम मंदिराची उभारणी, कलम ३७० रद्द करणे, तिहेरी तलाक कायदा रद्द करणे, सीएए लागू करणे, ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य तसेच गरीब कल्याणकारी योजना या भाजपच्या जमेच्या बाजू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला विश्वास आहे की, केंद्रात तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल.

विरोधकांची एकजूट

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजयी रथ रोखण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी इंडिया एकजूट होऊन लढणार आहे. जास्तीत जास्त जागांवर विरोधकांचा एकच उमेदवार उभा करून विरोधी मतांचे विभाजन रोखण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. पश्चिम बंगाल, पंजाब अशी काही राज्ये सोडली तर इतर राज्यांत विरोधी पक्ष एकवटले आहेत. पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून एकाही नेत्याच्या नावावर एकमत न होणे ही विरोधकांची सर्वांत मोठी कमजोरी आहे. ममता बॅनर्जी, भगवंत मान, मायावती यांसारख्या नेत्यांनी आघाडी नाकारणे ही एक इंडिया आघाडीसाठी नकारात्मक बाजू आहे.

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसBJPभाजपा