शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात नववधू गेली वाहून; तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 12:18 PM

The bride washed away in flood : मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात नवविवाहित वधूसह काही जण वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. देश या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका क्षणांत पावसामुळे होत्याचं नव्हतं झालं आहे. तेलंगणाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात नवविवाहित वधूसह काही जण वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार. तेलंगणाच्या विकाराबाद आणि रंगारेड्डी जिल्ह्यामध्ये एका नव्या नवरीसह पाच जण पुरात वाहून गेले आहेत. तिघांचे मृतदेह सापडले असून बाकींचा शोध सुरू आहे. नवविवाहित जोडप्यासह सहा जणांना घेऊन जाणारी एक कार रविवारी पुराच्या पाण्यात अडकली. स्थानिक लोकांना नवरदेव नवाज रेड्डी आणि त्याची बहीण राधम्मा यांना कारचा दरवाजा उघडून वाचवण्यात यश आलं. पोलिसांनी मासेमारी करणाऱ्या लोकांच्या मदतीने तीन जणांचे मृतदेह शोधून काढले आहेत. मृतांमध्ये नववधू प्रवालिका, नवरदेवाची बहीण श्रुति आणि ड्रायव्हर रघुवेंद्र रेड्डी यांचा समावेश आहे. तर एका लहान मुलाचा देखील शोध सुरू आहे. 

नवाज रेड्डी आणि प्रवालिका यांचं 26 ऑगस्टला लग्न झालं होतं. लग्नानंतर हे नवं जोडपं पहिल्यांदाच रविवारी मोमिनपेट येथे राहणाऱ्या आपल्या एका नातेवाईकाकडे गेलं होतं. संध्याकाळच्या वेळेस ते रावुलापल्ली गावातून निघाले होते. मात्र जोरदार पाऊस असल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पुराचं पाणी नाल्यातून मोठ्या प्रमाणात वाहत होतं. ड्रायव्हरला कार पाण्यातून बाहेर काढता येईल असा विश्वास होता. मात्र तो यात अपयशी ठरला आणि कारसह सर्वच जण पुराच्या पाण्यात अडकले. कारमधील चार जण वाहून गेले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :TelanganaतेलंगणाDeathमृत्यूRainपाऊसfloodपूरIndiaभारतmarriageलग्न