शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात नववधू गेली वाहून; तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 12:25 IST

The bride washed away in flood : मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात नवविवाहित वधूसह काही जण वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. देश या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका क्षणांत पावसामुळे होत्याचं नव्हतं झालं आहे. तेलंगणाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात नवविवाहित वधूसह काही जण वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार. तेलंगणाच्या विकाराबाद आणि रंगारेड्डी जिल्ह्यामध्ये एका नव्या नवरीसह पाच जण पुरात वाहून गेले आहेत. तिघांचे मृतदेह सापडले असून बाकींचा शोध सुरू आहे. नवविवाहित जोडप्यासह सहा जणांना घेऊन जाणारी एक कार रविवारी पुराच्या पाण्यात अडकली. स्थानिक लोकांना नवरदेव नवाज रेड्डी आणि त्याची बहीण राधम्मा यांना कारचा दरवाजा उघडून वाचवण्यात यश आलं. पोलिसांनी मासेमारी करणाऱ्या लोकांच्या मदतीने तीन जणांचे मृतदेह शोधून काढले आहेत. मृतांमध्ये नववधू प्रवालिका, नवरदेवाची बहीण श्रुति आणि ड्रायव्हर रघुवेंद्र रेड्डी यांचा समावेश आहे. तर एका लहान मुलाचा देखील शोध सुरू आहे. 

नवाज रेड्डी आणि प्रवालिका यांचं 26 ऑगस्टला लग्न झालं होतं. लग्नानंतर हे नवं जोडपं पहिल्यांदाच रविवारी मोमिनपेट येथे राहणाऱ्या आपल्या एका नातेवाईकाकडे गेलं होतं. संध्याकाळच्या वेळेस ते रावुलापल्ली गावातून निघाले होते. मात्र जोरदार पाऊस असल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पुराचं पाणी नाल्यातून मोठ्या प्रमाणात वाहत होतं. ड्रायव्हरला कार पाण्यातून बाहेर काढता येईल असा विश्वास होता. मात्र तो यात अपयशी ठरला आणि कारसह सर्वच जण पुराच्या पाण्यात अडकले. कारमधील चार जण वाहून गेले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :TelanganaतेलंगणाDeathमृत्यूRainपाऊसfloodपूरIndiaभारतmarriageलग्न