शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
2
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
3
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
4
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
5
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
6
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
7
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
8
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
9
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
10
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
11
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
12
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
13
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
14
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
15
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
16
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
17
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
18
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
19
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
20
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात नववधू गेली वाहून; तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 12:25 IST

The bride washed away in flood : मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात नवविवाहित वधूसह काही जण वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. देश या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका क्षणांत पावसामुळे होत्याचं नव्हतं झालं आहे. तेलंगणाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात नवविवाहित वधूसह काही जण वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार. तेलंगणाच्या विकाराबाद आणि रंगारेड्डी जिल्ह्यामध्ये एका नव्या नवरीसह पाच जण पुरात वाहून गेले आहेत. तिघांचे मृतदेह सापडले असून बाकींचा शोध सुरू आहे. नवविवाहित जोडप्यासह सहा जणांना घेऊन जाणारी एक कार रविवारी पुराच्या पाण्यात अडकली. स्थानिक लोकांना नवरदेव नवाज रेड्डी आणि त्याची बहीण राधम्मा यांना कारचा दरवाजा उघडून वाचवण्यात यश आलं. पोलिसांनी मासेमारी करणाऱ्या लोकांच्या मदतीने तीन जणांचे मृतदेह शोधून काढले आहेत. मृतांमध्ये नववधू प्रवालिका, नवरदेवाची बहीण श्रुति आणि ड्रायव्हर रघुवेंद्र रेड्डी यांचा समावेश आहे. तर एका लहान मुलाचा देखील शोध सुरू आहे. 

नवाज रेड्डी आणि प्रवालिका यांचं 26 ऑगस्टला लग्न झालं होतं. लग्नानंतर हे नवं जोडपं पहिल्यांदाच रविवारी मोमिनपेट येथे राहणाऱ्या आपल्या एका नातेवाईकाकडे गेलं होतं. संध्याकाळच्या वेळेस ते रावुलापल्ली गावातून निघाले होते. मात्र जोरदार पाऊस असल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पुराचं पाणी नाल्यातून मोठ्या प्रमाणात वाहत होतं. ड्रायव्हरला कार पाण्यातून बाहेर काढता येईल असा विश्वास होता. मात्र तो यात अपयशी ठरला आणि कारसह सर्वच जण पुराच्या पाण्यात अडकले. कारमधील चार जण वाहून गेले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :TelanganaतेलंगणाDeathमृत्यूRainपाऊसfloodपूरIndiaभारतmarriageलग्न