शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

चिनी वस्तूंवर बहिष्काराचे शस्त्र; सर्वत्र जनजागृती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 06:58 IST

आर्थिक नाकेबंदीची मागणी; सीमेवर आगळीक करणाऱ्या देशाला अद्दल घडविण्याचे आवाहन

- प्रसाद गो. जोशी नाशिक : सीमेवर आगळीक करून भारतीय जवानांच्या जीवितास हानी पोहोचविणाºया चीनच्या विरोधात देशभर जनमत प्रचंड तापले असून, चीनमधून येणाºया वस्तूंवर बहिष्कार घालून चीनला अद्दल घडविण्याचा निर्धार जनमानसातून व्यक्त होत आहे. विविध ठिकाणी यासाठी आंदोलने सुरू झाली असून, त्यास जनतेचा वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे.भारतीयांच्या रोजच्या वापरात असलेल्या अनेक गोष्टी या चीनमधून आयात झालेल्या असतात. टूथपेस्टपासून सौंदर्यप्रसाधनांपर्यंत अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. ही उत्पादने भारतातही तयार होतात. मात्र त्यांचे मूल्य जास्त असल्यामुळे अनेकजण चिनी वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य देत असतात. भारतीयांनी चिनी वस्तू वापरणे बंद केले तर चीनला मिळणारे उत्पन्न बंद होऊ शकते, असे मत चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करणाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.चीनमधून भारत विविध प्रकारच्या वस्तू अनेक वर्षांपासून आयात करीत आहे. भारत हा चीनचा मोठा आयातदार देश आहे. मात्र भारताकडून मिळणारा पैसा भारताच्या विरोधातच वापरणाºया चीनबद्दल सर्वत्र संताप आहे. त्यामुळेच चिनी मालावर बहिष्कार घालून भारताने स्वावलंबी बनावे, अशी भावना अनेक मान्यवर व्यक्ती व समूह करीत आहेत. भारताने स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वदेशीचा पुरस्कार केला आहे.1905मध्ये लोकमान्य टिळकांनी देशवासीयांना दिलेल्या चतु:सूत्रीत स्वदेशीचा पुरस्कार केला होता. पुढे स्वातंत्र्य आंदोलनात परकीय वस्तूंची होळी केली गेली. त्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व करताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वदेशीच्या जोडीलाच स्वावलंबनाचाही अंगीकार करण्याचे आवाहन केले. भारताने चिनी वस्तूंवरील आपले अवलंबित्व कमी केल्यास भारतात रोजगार वाढू शकतो, असे मत अनेक तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.भारतीय बाजारपेठेत चिनी बनावटीच्या ओप्पो, शाओमी, विवो, टेक्नो, रिअलमी, इन्फिनिक्स, वन प्लस आदी कंपन्यांचे मोबाइल मोठ्या प्रमाणात येतात. पण त्यापैकी बहुसंख्य मोबाइल लवकर बिघडतात वा खराब होतात, अशी लोकांची तक्रार असल्याचे दिसून आले.चीनमधून दुग्धजन्य पदार्थ, फळे, सुकामेवा, चहा, कॉफी, मसाले, खाद्य तेल, तेलबिया, धान्य, औषधे, रसायने, साखर, कॅमेरे, खेळणी, सौंदर्यप्रसाधने, विविध यंत्रसामुग्री,संगणकाचे सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक तसेच इलेक्ट्रिकच्या वस्तू, सजावटीच्या वस्तू, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ, फॅट्स, मासे, पादत्राणे आदींची आयात होते. पण भारतीय कंपन्याही या सर्व वस्तू तयार करतात. त्या वापरल्यास भारतात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल.टिकटॉक, हॅलो, शेअरइट, क्वाई, यूसी ब्राउजर, बिगो लाईव्ह, झेंडर, कॅम स्कॅनर ही अ‍ॅप सर्रास वापरली जातात. अनेकांना ही अ‍ॅप वा मोबाइल गेम चिनी आहेत, हेच माहीत नसते.2018-19 या वर्षामध्ये भारताने चीनकडून आयात केलेल्या वस्तूंचे मूल्य ४,९२,०७,९२८.३४ लाख रुपये एवढे असून, देशाच्या आयातीतील हे प्रमाण १३.६८ टक्के इतके वाढले आहे.2019-20 या वर्षामध्ये भारताने चीनकडून केलेल्या आयातीचे मूल्य ४,४०,१०,१६८.४७ लाख इतके म्हणजे काहीसे कमी झाले असले तरी देशाच्या एकूण आयातीपैकी ही वाढ अधिकच म्हणजे १४.०८ टक्के एवढी होती.भारतामधील विविध स्टार्टअपमध्ये चिनी उद्योगांनी गुंतवणूक केली आहे. त्या माध्यमामधूनही चीन आपल्याकडे पैसा ओढत आहे. सरकारने या बाबीकडे लक्ष देऊन चीनच्या गुंतवणुकीला पायबंद घालण्याची गरज आहे.- प्रवीण खंडेलवाल, सरचिटणीस, सीएआयटी

टॅग्स :chinaचीन