पाण्याच्या पाटावरून वाहिले रक्ताचे पाट, भीषण गोळीबार, २ जणांचा मृत्यू, ३ जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 16:21 IST2025-10-20T16:18:15+5:302025-10-20T16:21:27+5:30

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामधील सैथली गावामध्ये पाटाच्या पाण्यावरून झालेल्या वादामधून रक्ताचे पाट वाहिले गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाटाच्या पाण्यावरून झालेला वाद सोडवण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीमध्ये वादावादी होऊन त्याचं पर्यावसान गोळीबारात झाले.

Blood flowed from the watercourse, fierce gunfire, 2 people died, 3 injured | पाण्याच्या पाटावरून वाहिले रक्ताचे पाट, भीषण गोळीबार, २ जणांचा मृत्यू, ३ जखमी 

पाण्याच्या पाटावरून वाहिले रक्ताचे पाट, भीषण गोळीबार, २ जणांचा मृत्यू, ३ जखमी 

उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामधील सैथली गावामध्ये पाटाच्या पाण्यावरून झालेल्या वादामधून रक्ताचे पाट वाहिले गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाटाच्या पाण्यावरून झालेला वाद सोडवण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीमध्ये वादावादी होऊन त्याचं पर्यावसान गोळीबारात झाले. या गोळीबारात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.

या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं दीपांशू भाटी (२१) आणि अजयपाल भाटी (५५) अशी आहेत. या प्रकरणी अनूप भाटी याने तक्रार दिली आहे. प्रिन्स भाटी, बोबी तोंगड आणि मनोज नागर यांनी आमच्यावर गोळीबार केला, त्यात दोघांचा मृत्यू झाला, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

अनूप भाटी याने पोलिसांना सांगितले की, पाटाचं पाणी काढण्यावरून वाद सुरू होता. हा वाद सोडवण्यासाठी दोन्ही पक्षांची पंचायत बोलावण्यात आली होती. पंचायत सुरू असतानाच वाद वाढत गेला. त्याचदरम्यान प्रिन्स भाटी, बोबी तोंगड आणि मनोज नागर यांनी गोळीबार केला. या गोळीबारात दीपांशू भाटी आणि अजयपाल भाटी यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी संतप्त प्रतिक्रिया देत रास्ता रोको केलं. दरम्यान, या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली आहेत. तसेच काही लोकांना ताब्यात घेऊन पुढील तपास केला जात आहे.   

Web Title : पानी के विवाद में खूनी संघर्ष: यूपी गांव में गोलीबारी, 2 की मौत

Web Summary : ग्रेटर नोएडा के सैथली गांव में पानी के विवाद में मध्यस्थता के दौरान घातक गोलीबारी हुई। दो लोगों की मौत हो गई, और तीन घायल हो गए। पुलिस जांच कर रही है, कई टीमें गठित की गई हैं और गिरफ्तारियां हुई हैं। घटना से विरोध प्रदर्शन और सड़क जाम हो गया।

Web Title : Water Dispute Turns Deadly: Shooting in UP Village, 2 Killed

Web Summary : A water dispute in Greater Noida's Saithli village escalated into a deadly shooting during a mediation. Two people died, and three were injured. Police are investigating, with multiple teams formed and arrests made. The incident sparked protests and road blockades.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.