शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

कर्नाटकात स्थिर सरकार चालविण्यासाठी भाजपासमोर नवं आव्हान?; येडियुरप्पा दिल्लीला रवाना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 10:54 IST

या विजयी आमदारांनी केलेल्या मागणीनंतर बी.एस येडियुरप्पा हे दिल्लीला रवाना झाले आहेत.

ठळक मुद्देकर्नाटकच्या राजकीय नाट्यात पुन्हा एकदा नवं वळण? विजयी आमदारांकडून महत्त्वाच्या खात्यांची मागणी आमदारांच्या मागण्या घेऊन येडियुरप्पा दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी बोलणार

बंगळुरु - कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विजयानंतर मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांच्यासमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. जिंकलेल्या आमदारांना मंत्री बनविण्यात येईल असं येडियुरप्पा यांनी म्हटलं होतं पण विजयी आमदारांच्या मनात वेगळचं राजकारण शिजत असल्याचं दिसून येत आहे. फक्त मंत्रिपद नव्हे तर महत्त्वाची खाती द्यावीत अशी मागणी या आमदारांनी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याकडे केली आहे. 

५ डिसेंबर रोजी कर्नाटकात झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल ९ डिसेंबर रोजी लागले. भाजपा १५ पैकी १२ जागांवर विजय मिळवित कर्नाटकात स्थिर सरकार आणलं. या जागांवर जिंकलेले भाजपा आमदार हे काँग्रेस-जेडीएस या पक्षातील बंडखोर आहेत. येडियुरप्पा सरकार बनविण्यासाठी ७ आमदारांची गरज होती. या पोटनिवडणुकीतील निकालामुळे कर्नाटकात भाजपाचं मजबूत सरकार आलं. निकाल येताच येडियुरप्पा यांनीही जिंकणाऱ्या आमदारांना मंत्री बनविण्याची घोषणा केली. 

येडियुरप्पा यांनी सांगितले होते की, विजयी १२ आमदारांपैकी ११ जणांना कॅबिनेट मंत्री बनविण्यात येईल. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे आमदार फक्त मंत्रिपदावर समाधानी नाहीत तर त्यांना गृह, सार्वजनिक बांधकाम, सिंचन, उर्जा यासारखे महत्त्वाची खात्याची मागणी त्यांनी येडियुरप्पा यांच्याकडे केली आहे. 

नवनिर्वाचित आमदारांनी केलेल्या मागणीमागे कारण सांगितले जात आहे की, येडियुरप्पा सरकार त्यांच्या पाठिंब्यावर चालणार आहे. त्यामुळे या आमदारांना महत्त्वाची खाती हवीत. तसेच जे तीन नेते पराभूत झाले त्यांनाही डावलून चालणार नाही. पोटनिवडणुकीत नागराज, विश्वनाथ आणि रोशन बेग यांचा पराभव झाला आहे. 

या विजयी आमदारांनी केलेल्या मागणीनंतर बी.एस येडियुरप्पा हे दिल्लीला रवाना झाले आहेत. पक्षातील वरिष्ठ नेत्यांची चर्चा करुन आमदारांच्या मागण्या बैठकीत मांडणार आहेत. आमदार आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अडून राहिले आहेत अशातच स्थिर सरकार चालविण्यासाठी येडियुरप्पा यांच्यासमोर नवं आव्हान निर्माण झालं आहे. 

२०१८ मध्ये कर्नाटक निवडणुकीत भाजपाला सर्वात जास्त जागा मिळाल्या होत्या. मात्र बहुमताचा आकडा गाठता आला नाही. काँग्रेस-जेडीएसने एकत्र येत कर्नाटकात सरकार स्थापन केलं. एचडी कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले. मात्र काँग्रेस-जेडीएसच्या १५ आमदारांनी बंडखोरी केल्याने अल्पावधीत हे सरकार कोसळलं. कुमारस्वामी सरकार पडलं. यानंतर बी. एस येडियुरप्पा यांनी बहुमताचा दावा करत कर्नाटकात भाजपा सरकार आणलं. 

टॅग्स :B. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पाKarnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसkumarswamyकुमारस्वामी