शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

भाजप किमान ३० वर्षे केंद्रातील सत्तेत राहील, अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 06:39 IST

Amit Shah News: जर पक्ष दिवसरात्र कष्ट करत असेल व तुम्ही स्वत:ऐवजी देशासाठी जगत असाल तर विजय तुमचाच असेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. राजधानी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात संवाद साधताना गृहमंत्री बोलत होते.

नवी दिल्ली - भाजप सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे आमचा पक्ष किमान आणखी ३० वर्षे केंद्रातील सत्तेत राहील. लोकशाहीत कोणत्याही पक्षाचे यश हे कठोर परिश्रमावर अवलंबून असते. जर पक्ष दिवसरात्र कष्ट करत असेल व तुम्ही स्वत:ऐवजी देशासाठी जगत असाल तर विजय तुमचाच असेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. राजधानी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात संवाद साधताना गृहमंत्री बोलत होते.

भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष असताना पक्ष पुढील तीस वर्षे केंद्रातील सत्तेत राहील असे विधान मी केले होते. केंद्रातील सत्ता मिळून आता कुठे १० वर्षे झाले आहेत. जर एखादा पक्ष चांगली कामगिरी करत असेल तर त्याला जनतेची साथ व जिंकण्याचा विश्वास मिळतो. भाजपचे सरकार असणाऱ्या राज्यांमध्ये  टप्प्याटप्प्याने समान नागरी कायदा (यूसीसी) लागू केला जात आहे. 

...तेव्हा राहुल गांधी व्हिएतनाममध्ये होतेलोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लोकसभेत बोलण्यासाठी वेळ दिला होता. मात्र, तेव्हा ते व्हिएतनाममध्ये होते असा दावा करत अमित शाहांनी काँग्रेस नेत्यावर टीका केली. अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी त्यांना ४२ टक्के वेळ देण्यात आला होता. त्या वेळेत कोण बोलणार हे त्यांना ठरवायचे होते. मात्र, जेव्हा संसदेत गंभीर चर्चा सुरू होती, तेव्हा ते व्हिएतनाममध्ये होते. मात्र, परत आल्यानंतर त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार बोलण्याचा आग्रह धरल्याचा आरोप करत गृहमंत्र्यांनी गांधींना लक्ष्य केले.  

संविधान सभेचा निर्णयभाजपची स्थापना झाल्यापासून मुद्दा अजेंड्यावर आहे. यूसीसी लागू करणे हा संविधान सभेचा निर्णय होता. काँग्रेसला विसर पडला असावा, असे  गृहमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध धर्माच्या आधारावर दिले जाणारे आरक्षण हे संविधानाचे उल्लंघन आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याला आमचा विरोध असल्याचे स्पष्ट करत काँग्रेस सरकारने कंत्राटांमध्ये अल्पसंख्याकांना दिलेल्या ४ टक्के आरक्षणाला विरोध केला. कर्नाटक सरकारने अल्पसंख्याक समुदायाला दिलेले आरक्षण हा लॉलीपॉप असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाIndiaभारत