शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

भाजपची सत्ता जाणार, देशात अच्छे दिन फटाफट फटाफट येणार: राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 12:47 IST

उन्हाच्या वाढत्या झळांचा त्रास झाल्याने डोक्यावर ओतले पाणी

बांसगाव: ४ जूननंतर केंद्रातील भाजपची सत्ता जाणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनता बाय बाय करणार आहे. इंडिया आघाडीला मते खटाखट खटाखट मिळत आहेत. त्यामुळे भाजपपासून देशाची सुटका होणार असून देशात अच्छे दिन फटाफट फटाफट येणार असल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.

इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात आले तर आरक्षणावर असलेली ५० टक्क्यांची मर्यादा आम्ही रद्दबातल करणार, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली. इंडिया आघाडी जीवाची बाजी लावून राज्यघटनेचे रक्षण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशमधील बांसगाव येथे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या समवेत मंगळवारी घेतलेल्या प्रचारसभेत त्यांनी सांगितले की, देशाची राज्यघटना व इंडिया आघाडी एका बाजूला आहेत, तर दुसऱ्या बाजूला राज्यघटना संपविण्यासाठी सज्ज असलेले लोक आहेत. इंडिया आघाडी देशाच्या राज्यघटनेला अजिबात धक्का लागू देणार नाही.

...डोक्यावर ओतले पाणी

बांसगाव येथे प्रचारादरम्यान राहुल गांधी यांना उन्हाच्या वाढत्या झळांचा त्रास झाला. यावेळी त्यांनी भाषण देत असतानाच पाणी पिले. त्यानंतर खूपच उकाडा असल्याचे म्हणत पाण्याची पूर्ण बॉटल आपल्या डोक्यावर ओतली.

उद्योगपतींना मदत

राहुल गांधी म्हणाले की, मोदी यांना देवाने गरिबांना नव्हे तर उद्योगपतींना मदत करण्याकरिता पाठविले आहे. ‘इंडिया’  सत्तेवर आल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था खूप वेगाने प्रगती करेल.

‘मोदी यांच्या राजवटीत कायद्याचे राज्य संपुष्टात’

  • मोदींच्या राजवटीत कायद्याचे राज्य संपुष्टात आले आहे, अशी टीका राहुल यांनी केली.
  • कोणत्याही अत्याचाराविरोधात समाजातील तळागाळातला माणूस आवाज उठवू शकेल, अशी यंत्रणा आम्ही निर्माण करू.
  • बाबासाहेबांचे संविधान हटवून वंचितांचे हक्क व आरक्षण हिरावून घेणे हे नरेंद्र मोदी आणि भाजपचे अंतिम ध्येय आहे, असे ते म्हणाले.
टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा