शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

भाजपची सत्ता जाणार, देशात अच्छे दिन फटाफट फटाफट येणार: राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 12:47 IST

उन्हाच्या वाढत्या झळांचा त्रास झाल्याने डोक्यावर ओतले पाणी

बांसगाव: ४ जूननंतर केंद्रातील भाजपची सत्ता जाणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनता बाय बाय करणार आहे. इंडिया आघाडीला मते खटाखट खटाखट मिळत आहेत. त्यामुळे भाजपपासून देशाची सुटका होणार असून देशात अच्छे दिन फटाफट फटाफट येणार असल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.

इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात आले तर आरक्षणावर असलेली ५० टक्क्यांची मर्यादा आम्ही रद्दबातल करणार, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली. इंडिया आघाडी जीवाची बाजी लावून राज्यघटनेचे रक्षण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशमधील बांसगाव येथे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या समवेत मंगळवारी घेतलेल्या प्रचारसभेत त्यांनी सांगितले की, देशाची राज्यघटना व इंडिया आघाडी एका बाजूला आहेत, तर दुसऱ्या बाजूला राज्यघटना संपविण्यासाठी सज्ज असलेले लोक आहेत. इंडिया आघाडी देशाच्या राज्यघटनेला अजिबात धक्का लागू देणार नाही.

...डोक्यावर ओतले पाणी

बांसगाव येथे प्रचारादरम्यान राहुल गांधी यांना उन्हाच्या वाढत्या झळांचा त्रास झाला. यावेळी त्यांनी भाषण देत असतानाच पाणी पिले. त्यानंतर खूपच उकाडा असल्याचे म्हणत पाण्याची पूर्ण बॉटल आपल्या डोक्यावर ओतली.

उद्योगपतींना मदत

राहुल गांधी म्हणाले की, मोदी यांना देवाने गरिबांना नव्हे तर उद्योगपतींना मदत करण्याकरिता पाठविले आहे. ‘इंडिया’  सत्तेवर आल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था खूप वेगाने प्रगती करेल.

‘मोदी यांच्या राजवटीत कायद्याचे राज्य संपुष्टात’

  • मोदींच्या राजवटीत कायद्याचे राज्य संपुष्टात आले आहे, अशी टीका राहुल यांनी केली.
  • कोणत्याही अत्याचाराविरोधात समाजातील तळागाळातला माणूस आवाज उठवू शकेल, अशी यंत्रणा आम्ही निर्माण करू.
  • बाबासाहेबांचे संविधान हटवून वंचितांचे हक्क व आरक्षण हिरावून घेणे हे नरेंद्र मोदी आणि भाजपचे अंतिम ध्येय आहे, असे ते म्हणाले.
टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा