दिल्लीत दारुण पराभव...! AAP कार्यालयाचे दरवाजे आतून बंद केले गेले; कोणालाच 'प्रवेश' नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 13:39 IST2025-02-08T13:37:25+5:302025-02-08T13:39:03+5:30
BJP vs AAP Delhi Election Results 2025 news: अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. सिसोदियांचा पराभव झालेला आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री पद घेतलेल्या आतिशी यांनी काही तो विजय प्राप्त केला आहे. अशातच हा पराभव आपला सहन झालेला दिसत नसल्याचे त्यांच्या पक्ष मुख्यालयात चित्र दिसत आहे.

दिल्लीत दारुण पराभव...! AAP कार्यालयाचे दरवाजे आतून बंद केले गेले; कोणालाच 'प्रवेश' नाही
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा दारुण पराभव होताना दिसत आहे. सेनापती, मंत्री सारे गारद झाले आहेत. अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. सिसोदियांचा पराभव झालेला आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री पद घेतलेल्या आतिशी यांनी काही तो विजय प्राप्त केला आहे. अशातच हा पराभव आपला सहन झालेला दिसत नसल्याचे त्यांच्या पक्ष मुख्यालयात चित्र दिसत आहे.
अण्णा हजारेंची दिल्ली निकालावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, केजरीवालांना या गोष्टीने बुडविले...
आपच्या मुख्यालयाचे मुख्य गेट आतून बंद करण्यात आले आहे. कोणालाच प्रवेश दिला जात नाहीय. या कार्यालयात काम करणाऱ्या महिलेला देखील आतमध्ये घेतलेले नाहीय. तिला आतमध्ये घेण्यासाठी कार्यकर्ते फोनाफोनी करताना दिसत आहेत. सुरुवातीच्या कलांत आप मागे पडल्याचे दिसताच आपच्या कार्यालयात शुकशुकाट पसरलेला होता. आता केजरीवाल पराभवाच्या छायेत असल्याचे समजल्यानंतर गेटच बंद करून घेण्यात आले आहे.
आपच्या वरिष्ठ पातळीवरचे बहुतांश सर्व नेते पराभूत झाले आहेत. भाजपाच्या प्रवेश वर्मा यांनी केजरीवालांना 3186 मतांनी पराभूत केले आहे. आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून सुमारे ६०० मतांनी पराभूत झाले आहेत. राजेंद्र नगर मतदारसंघातून आपचे दुर्गेश पाठक यांचाही पराभव झाला आहे.
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल पराभूत; प्रवेश वर्मांनी कमाल केली, अमित शाह यांची भविष्यवाणी खरी ठरली
केजरीवालच कारण...
केजरीवाल यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात साधेपणा आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक म्हणून केली. मेट्रोने प्रवास करणे, स्वस्त गाडीने प्रवास करणे, सुरक्षा घेण्यास नकार देणे, या सर्व गोष्टींमुळे ते अन्य राजकारणी लोकांपेक्षा वेगळे ठरले होते. पण लवकरच ही प्रतिमा नाहीशी होऊ लागली. त्यांच्या ४० कोटी रुपयांच्या सरकारी बंगल्यावरील वादामुळे त्यांच्या साध्या राहणीमानाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला. जनतेने त्यांना स्वतःचा नेता म्हणून निवडले होते पण त्यांची व्हीव्हीआयपी जीवनशैली पाहिल्यानंतर जनतेला स्वतःची फसवणूक झाल्याचे आढळले. त्यात दारु घोटाळ्यात तुरुंगात जाणे, भाजपविरोधात छोट्या छोट्या गोष्टींवरून राजकारण करत राहणे, या गोष्टींना जनता कंटाळली होती. याचाच परिणाम आपच्या आणि त्यांच्या पराभवात रुपांतरीत झाला.