शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

पोलीस Vs सीबीआय: सीबीआयच्या अधिकाऱ्यांची सुटका; ममता बॅनर्जींचे आंदोलन सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 09:47 IST

शारदा चिटफंड घोटाळ्यात कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर तेथील वातावरण तणावाचे झाले आहे.

कोलकाता : शारदा चिटफंड घोटाळ्यात कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर तेथील वातावरण तणावाचे झाले आहे. यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा पश्चिम बंगाल सरकारचा छळ करत आहे. बंगालला नष्ट करण्याचे मनसुबे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी सीबीआय अधिकाऱ्यांना सोडले असून ममता बॅनर्जी यांनी मेट्रो सिनेमासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. 

 

 कोलकाता येथील सीबीआयच्या प्रादेशिक कार्यालयासमोरील पोलीस फौजफाटा काढून घेण्यात आला असून सीआरपीएफच्या जवानांनी या ठिकाणाचा ताबा घेतला आहे. 

 

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने घेतलेली ब्रिगेड रॅली पाहून भाजपा घाबरली आहे. यामुळे बंगालच्या नागरिकांना छळण्याचे काम ते करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वापरलेली भाषा तुम्ही ऐकली असेल, असा आरोप ममता यांनी केला.

 

पश्चिम बंगालमध्ये तणाव; सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

 

कोलकाताचे पोलिस आयुक्त राजीव कुमार हे जगातील चांगल्या लोकांपैकी एक आहेत, हे मी आताही सांगणार. राज्याच्या पोलिस दलाच्या संरक्षणाची जबाबदारी माझ्यावर असल्याचा अभिमान आहे. कोणतीही परवानगी न घेता, नोटीस न पाठवता सीबीआयचे अधिकारी पोलिस आयुक्तांच्या घरात प्रवेश कसे करू शकतात. आम्ही सीबीआयच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणी अटक करू शकतो. मात्र, त्यांना केवळ ताब्यात घेतले आहे. काहीही झाले तरीही आपण पोलिसांच्या बाजुने राहणार. लोकशाहीच्या ढाच्याला धक्का दिल्याबद्दल मला वाईट वाटत आहे, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. 

 

 

तर या कारवाईवरून भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी पश्चिम बंगालमध्ये लोकशाही संपल्याचा आरोप केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, ममता बॅनर्जी यांचे सरकार परवानगी नाकारत आहेत. सीबीआय अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याचा प्रकार स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच घडला आहे. भाजपा या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत आहे, असे त्यांनी म्हटले.

 

सीबीआय अधिकाऱ्यांना शेक्सपीअर सरानी पोलिस ठाण्यात ठेवण्यात आल्याप्रकरणी सीबीआयचे अंतरिम प्रमुख एम नागेश्वर राव यांनी कायदेतज्ज्ञांना पाचारण केले असून त्यांच्या सुचनेनुसारच पाऊल उचलले जाणार असल्याचे सांगितले. 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालPoliceपोलिसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी