शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

पोलीस Vs सीबीआय: सीबीआयच्या अधिकाऱ्यांची सुटका; ममता बॅनर्जींचे आंदोलन सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 09:47 IST

शारदा चिटफंड घोटाळ्यात कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर तेथील वातावरण तणावाचे झाले आहे.

कोलकाता : शारदा चिटफंड घोटाळ्यात कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर तेथील वातावरण तणावाचे झाले आहे. यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा पश्चिम बंगाल सरकारचा छळ करत आहे. बंगालला नष्ट करण्याचे मनसुबे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी सीबीआय अधिकाऱ्यांना सोडले असून ममता बॅनर्जी यांनी मेट्रो सिनेमासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. 

 

 कोलकाता येथील सीबीआयच्या प्रादेशिक कार्यालयासमोरील पोलीस फौजफाटा काढून घेण्यात आला असून सीआरपीएफच्या जवानांनी या ठिकाणाचा ताबा घेतला आहे. 

 

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने घेतलेली ब्रिगेड रॅली पाहून भाजपा घाबरली आहे. यामुळे बंगालच्या नागरिकांना छळण्याचे काम ते करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वापरलेली भाषा तुम्ही ऐकली असेल, असा आरोप ममता यांनी केला.

 

पश्चिम बंगालमध्ये तणाव; सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

 

कोलकाताचे पोलिस आयुक्त राजीव कुमार हे जगातील चांगल्या लोकांपैकी एक आहेत, हे मी आताही सांगणार. राज्याच्या पोलिस दलाच्या संरक्षणाची जबाबदारी माझ्यावर असल्याचा अभिमान आहे. कोणतीही परवानगी न घेता, नोटीस न पाठवता सीबीआयचे अधिकारी पोलिस आयुक्तांच्या घरात प्रवेश कसे करू शकतात. आम्ही सीबीआयच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणी अटक करू शकतो. मात्र, त्यांना केवळ ताब्यात घेतले आहे. काहीही झाले तरीही आपण पोलिसांच्या बाजुने राहणार. लोकशाहीच्या ढाच्याला धक्का दिल्याबद्दल मला वाईट वाटत आहे, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. 

 

 

तर या कारवाईवरून भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी पश्चिम बंगालमध्ये लोकशाही संपल्याचा आरोप केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, ममता बॅनर्जी यांचे सरकार परवानगी नाकारत आहेत. सीबीआय अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याचा प्रकार स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच घडला आहे. भाजपा या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत आहे, असे त्यांनी म्हटले.

 

सीबीआय अधिकाऱ्यांना शेक्सपीअर सरानी पोलिस ठाण्यात ठेवण्यात आल्याप्रकरणी सीबीआयचे अंतरिम प्रमुख एम नागेश्वर राव यांनी कायदेतज्ज्ञांना पाचारण केले असून त्यांच्या सुचनेनुसारच पाऊल उचलले जाणार असल्याचे सांगितले. 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालPoliceपोलिसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी