शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

"शेतकऱ्यांची कुठलीही चिंता नाही, 'किसान महापंचायत'च्या मागे राजकीय अजेंडा"; भाजपाचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2021 8:30 AM

BJP termed kisan mahapanchayat held in muzaffarnagar as election rally : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाने मुझफ्फरनगरमध्ये रविवारी 'किसान महापंचायत' आयोजित केली होती.

नवी दिल्ली - भाजपाने मुझफ्फरनगरमध्ये 'किसान महापंचायत' नाही तर 'निवडणूक सभा' होत असल्याचं म्हटलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चा राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप देखील आता भाजपाने केला आहे. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाने मुझफ्फरनगरमध्ये रविवारी 'किसान महापंचायत' आयोजित केली होती. यामध्ये उत्तर प्रदेश आणि शेजारी राज्यांमधील हजारो शेतकरी सहभागी झाले होते. भाजपाने यावरून जोरदार निशाणा साधत हल्लाबोल केला आहे. "शेतकऱ्यांची चिंता नाही, 'किसान महापंचायत'च्या मागे राजकीय अजेंडा" असल्याचं म्हटलं आहे.

भाजपाचे किसान मोर्चाचे प्रमुख आणि खासदार राजकुमार चाहर यांनी 'किसान महापंचायत'च्या मागे राजकीय अजेंडा आहे. त्यांना शेतकऱ्यांची कुठलीही चिंता नाही. ही 'किसान महापंचायत' नाही, तर राजकीय निवडणूक बैठक होती. विरोधी पक्ष आणि किसान संघटना राजकारणासाठी शेतकऱ्यांचा दुरुपयोग करत आहेत असं म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गेल्या सात वर्षांत जे काम शेतकऱ्यांसाठी केले आहे तितके काम कुठल्याच सरकारने केलेलं नाही असा दावा देखील चाहर यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या नव्या कृषा कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या अनेक संघटना गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत.

"उत्तर प्रदेश निवडणुकांआधी होणार मोठ्या हिंदू नेत्याची हत्या"; राकेश टिकैत यांचं वादग्रस्त विधान

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी (Rakesh Tikait) पुन्हा एकदा भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपापेक्षा घातक कोणताच पक्ष नाही असं म्हणत हल्लाबोल केला आहे. सिरसामध्ये ते बोलत होते. तसेच टिकैत यांनी य़ाच दरम्यान एक वादग्रस्त विधान देखील केलं आहे. उत्तर प्रदेश निवडणुकांआधी (Uttar Pradesh Election) एखाद्या मोठ्या हिंदू नेत्याची हत्या होऊ शकते असं म्हटलं आहे. हरियाणाच्या सिरसामध्ये शेतकरी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी भाजपा सरकारवर गंभीर आरोप केला. 

"भाजपापेक्षा धोकादायक इतर कोणता पक्ष नाही"

"उत्तर प्रदेश निवडणुकांच्या आधी एखाद्या मोठ्या हिंदू नेत्याची हत्या होणार आहे. त्यामुळे यांच्यापासून सावध राहा आणि हे एका मोठ्या हिंदू नेत्याची हत्या करून देशात हिंदू-मुसलमान या मुद्द्यावरुन निवडणूक जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत" असं देखील राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. "भाजपापेक्षा धोकादायक इतर कोणता पक्ष नाही. ज्या लोकांनी भाजपाची निर्मिती केली, आज त्याच नेत्यांनाही घरात कैद करून ठेवण्यात आलं आहे" असं टिकैत यांनी म्हटलं आहे. या "देशावर सरकारी तालिबानींचा कब्जा आहे. ज्या SDM ने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला त्यांचे चुलते RSS मध्ये मोठ्या पदावर आहे. हे आम्हाला खालिस्तानी म्हणत असतील तर आम्ही यांना तालिबानी म्हणू" असं ही टिकैत म्हणाले. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीBJPभाजपाPoliticsराजकारणrakesh tikaitराकेश टिकैत