शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

“कन्हैया कुमारचा काँग्रेस प्रवेश म्हणजे गटारातून नाल्यात पडल्यासारखं”; भाजपची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 11:35 AM

जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमारने काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

ठळक मुद्देकन्हैया कुमारचा काँग्रेस प्रवेश म्हणजे गटारातून नाल्यात पडल्यासारखंभाजपच्या एका ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेत्याची टीका

नवी दिल्ली: जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमारने काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानीदेखील यावेळी काँग्रेस परिवारात सामील झाले. कन्हैया कुमारने काँग्रेससोबत आपली नवीन राजकीय खेळी सुरू केली आहे. कन्हैय्या कुमार गतवेळेच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) मध्ये सामील झाले होते. यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. भाजपच्या एका ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेत्याने यावर प्रतिक्रिया देताना कन्हैया कुमारने केलेला काँग्रेस पक्षातील प्रवेश म्हणजे गटारातून नाल्यात पडल्यासारखे आहे, अशी टीका केली. (bjp kailash vijayvargiya says kanhaiya kumar joining congress means someone comes out of gutter and falls into drain)

मला वाटते की, या देशात काही लोक, ते केवळ लोक नाही, तर एक विचार आहे. या देशाची चिंतन परंपरा, संस्कृती, इतिहास, वर्तमान आणि भविष्य खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी कुठे तरी वाचले होते, की तुम्ही सर्वप्रथम तुमच्या शत्रूची निवड करा. मित्र, अपोआप तयार होतील. तर मी निवड केली आहे. लोकशाही पक्षात आम्ही यामुळे सामील होत आहोत, कारण जर काँग्रेस वाचली नाही, तर देशही वाचणार नाही, असे आता वाटू लागले आहे, असे कन्हैय्या कुमारने यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते. यानंतर आता भाजपकडून निशाणा साधण्यात आला असून, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी प्रतिक्रिया देत टीकास्त्र सोडले आहे. 

कन्हैयाचा काँग्रेस प्रवेश म्हणजे गटारातून नाल्यात पडल्यासारखे

जर कोणी गटारातून बाहेर पडून नाल्यात पडला तर मी फक्त त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करू शकतो, असा टोला विजयवर्गीय यांनी लगावला. पश्चिम बंगालच्या भवानीपूर येथून ते बोलते होते. दुसरीकडे, त्याने (कन्हैया कुमार) स्वतःला माझ्या पक्षातून बाहेर काढले. सीपीआय जातिहीन, वर्गहीन समाजासाठी लढत आहे. त्यांच्या काही वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि ध्येये नक्कीच असतील. कम्युनिस्ट आणि कामगार वर्गाच्या विचारसरणीवर त्याचा विश्वास नसल्याचे यावरून दिसून येते, अशी टीका सीपीआयचे सरचिटणीस डी राजा यांनी केली आहे. 

दरम्यान, जो सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे, तो वाचवता आला नाही, तर देशही वाचणार नाही. जर मोठे जहाज वाचले नाही, तर लहान बोटीही वाचणार नाहीत. मी जिथे जन्मलो, ज्या पक्षात मोठा झालो, त्याने मला शिकवले, लढण्याची हिम्मत दिली. मी त्या पक्षा सोबतच, अशा लाखो आणि कोट्यवधी लोकांचेही आभार मानतो, जे कुठल्याही पक्षाचे नव्हते, पण कुण्या पक्षाकडून आमच्यावर अनावश्यक आरोप झाल्यानंतर, ते आमच्यासाठी लढत होते. या देशाला केवळ काँग्रेसच नेतृत्व देऊ शकते, असे कन्हैय्या कुमारने म्हटले होते.  

टॅग्स :Politicsराजकारणkanhaiya kumarकन्हैय्या कुमारcongressकाँग्रेसBJPभाजपा