शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
3
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
4
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
5
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
6
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
7
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
8
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
9
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
10
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
11
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
12
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
13
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
14
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
15
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
16
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
17
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
18
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
19
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
20
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप

राज्यासह केंद्रात 50 वर्ष सत्तेत राहू; भाजपा नेत्याला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 07:40 IST

अमित शहा, राम माधव यांनीही 50 वर्ष सत्तेत राहू असा दावा केला होता

लखनऊ: राज्यासह केंद्रात 50 वर्षे राज्य करू, असा विश्वास उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी व्यक्त केला. पुढील 50 वर्षे कोणताही पक्ष भाजपाला सत्तेतून हटवू शकणार नाही. उत्तर प्रदेशात तर समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि कांग्रेसला कोणतंही भविष्य नाही. कारण या पक्षांनी मागासवर्गीय जातींना कधीच सन्मान दिला नाही, असं मौर्य यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करताना म्हटलं. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री मौर्य यांनी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अखिलेश यादव मागासवर्गीयांचे नव्हेत, तर केवळ यादव जातीतल्या एका वर्गाचे नेते आहेत. त्यांनी केवळ त्या वर्गाचा वापर केला, असा आरोप मौर्य यांनी केला. लोकसभा निवडणूक संपताच सपा आणि बसपाची महाआघाडी संपुष्टात आली. त्यावरुनही मौर्य यांनी टोला लगावला. 'निवडणूक संपताच दोघांनी कट्टी घेतली. एक भाच्यावर नाराज आहेत, तर दुसरा आत्येवर खट्टू झाला आहे. हे दोन पक्ष एकत्र असताना भाजपाला रोखू शकले नाहीत. मग आता एकटे असताना काय करणार?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अमेठीत उमललेलं कमळ राज्यातली काँग्रेस संपल्याचं चिन्ह असल्याचंही ते पुढे म्हणाले. मौर्य यांच्या आधी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि महासचिव राम माधव यांनीदेखील पक्ष पुढील 50 वर्षे सत्तेत असेल, असा विश्वास व्यक्त केला होता. आपण 2019 ची लोकसभा निवडणूक जिंकलो, तर 50 वर्षे सत्तेत राहू, असं शहांनी सप्टेंबर 2018 मध्ये राष्ट्रीय कार्यकारणीला संबोधित करताना म्हटलं होतं. तर राम माधव यांनी त्रिपुराची राजधानी अगरताळामध्ये एका रॅलीला संबोधित करताना पक्ष 2047 पर्यंत सत्तेत राहील, असा दावा केला होता.  

टॅग्स :BJPभाजपाAmit Shahअमित शहाcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीUttar Pradeshउत्तर प्रदेश