शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यासह केंद्रात 50 वर्ष सत्तेत राहू; भाजपा नेत्याला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 07:40 IST

अमित शहा, राम माधव यांनीही 50 वर्ष सत्तेत राहू असा दावा केला होता

लखनऊ: राज्यासह केंद्रात 50 वर्षे राज्य करू, असा विश्वास उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी व्यक्त केला. पुढील 50 वर्षे कोणताही पक्ष भाजपाला सत्तेतून हटवू शकणार नाही. उत्तर प्रदेशात तर समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि कांग्रेसला कोणतंही भविष्य नाही. कारण या पक्षांनी मागासवर्गीय जातींना कधीच सन्मान दिला नाही, असं मौर्य यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करताना म्हटलं. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री मौर्य यांनी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अखिलेश यादव मागासवर्गीयांचे नव्हेत, तर केवळ यादव जातीतल्या एका वर्गाचे नेते आहेत. त्यांनी केवळ त्या वर्गाचा वापर केला, असा आरोप मौर्य यांनी केला. लोकसभा निवडणूक संपताच सपा आणि बसपाची महाआघाडी संपुष्टात आली. त्यावरुनही मौर्य यांनी टोला लगावला. 'निवडणूक संपताच दोघांनी कट्टी घेतली. एक भाच्यावर नाराज आहेत, तर दुसरा आत्येवर खट्टू झाला आहे. हे दोन पक्ष एकत्र असताना भाजपाला रोखू शकले नाहीत. मग आता एकटे असताना काय करणार?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अमेठीत उमललेलं कमळ राज्यातली काँग्रेस संपल्याचं चिन्ह असल्याचंही ते पुढे म्हणाले. मौर्य यांच्या आधी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि महासचिव राम माधव यांनीदेखील पक्ष पुढील 50 वर्षे सत्तेत असेल, असा विश्वास व्यक्त केला होता. आपण 2019 ची लोकसभा निवडणूक जिंकलो, तर 50 वर्षे सत्तेत राहू, असं शहांनी सप्टेंबर 2018 मध्ये राष्ट्रीय कार्यकारणीला संबोधित करताना म्हटलं होतं. तर राम माधव यांनी त्रिपुराची राजधानी अगरताळामध्ये एका रॅलीला संबोधित करताना पक्ष 2047 पर्यंत सत्तेत राहील, असा दावा केला होता.  

टॅग्स :BJPभाजपाAmit Shahअमित शहाcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीUttar Pradeshउत्तर प्रदेश