शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

राज्यासह केंद्रात 50 वर्ष सत्तेत राहू; भाजपा नेत्याला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 07:40 IST

अमित शहा, राम माधव यांनीही 50 वर्ष सत्तेत राहू असा दावा केला होता

लखनऊ: राज्यासह केंद्रात 50 वर्षे राज्य करू, असा विश्वास उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी व्यक्त केला. पुढील 50 वर्षे कोणताही पक्ष भाजपाला सत्तेतून हटवू शकणार नाही. उत्तर प्रदेशात तर समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि कांग्रेसला कोणतंही भविष्य नाही. कारण या पक्षांनी मागासवर्गीय जातींना कधीच सन्मान दिला नाही, असं मौर्य यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करताना म्हटलं. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री मौर्य यांनी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अखिलेश यादव मागासवर्गीयांचे नव्हेत, तर केवळ यादव जातीतल्या एका वर्गाचे नेते आहेत. त्यांनी केवळ त्या वर्गाचा वापर केला, असा आरोप मौर्य यांनी केला. लोकसभा निवडणूक संपताच सपा आणि बसपाची महाआघाडी संपुष्टात आली. त्यावरुनही मौर्य यांनी टोला लगावला. 'निवडणूक संपताच दोघांनी कट्टी घेतली. एक भाच्यावर नाराज आहेत, तर दुसरा आत्येवर खट्टू झाला आहे. हे दोन पक्ष एकत्र असताना भाजपाला रोखू शकले नाहीत. मग आता एकटे असताना काय करणार?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अमेठीत उमललेलं कमळ राज्यातली काँग्रेस संपल्याचं चिन्ह असल्याचंही ते पुढे म्हणाले. मौर्य यांच्या आधी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि महासचिव राम माधव यांनीदेखील पक्ष पुढील 50 वर्षे सत्तेत असेल, असा विश्वास व्यक्त केला होता. आपण 2019 ची लोकसभा निवडणूक जिंकलो, तर 50 वर्षे सत्तेत राहू, असं शहांनी सप्टेंबर 2018 मध्ये राष्ट्रीय कार्यकारणीला संबोधित करताना म्हटलं होतं. तर राम माधव यांनी त्रिपुराची राजधानी अगरताळामध्ये एका रॅलीला संबोधित करताना पक्ष 2047 पर्यंत सत्तेत राहील, असा दावा केला होता.  

टॅग्स :BJPभाजपाAmit Shahअमित शहाcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीUttar Pradeshउत्तर प्रदेश