शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

JP Nadda: “देशातील तरुणांना विनाश नाही, विकास हवाय”; जेपी नड्डांचे विरोधकांना सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 1:15 PM

JP Nadda: देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे होतील, तेव्हाचा भारत कसा हवा? अशी विचारणा जेपी नड्डा यांनी केली आहे.

नवी दिल्ली: रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या निमित्ताने देशभरात काढण्यात आलेल्या शोभायात्रांदरम्यान काही हिंसक घटना घडल्या. यावरून राजकारण तापताना दिसत आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर विरोधकांकडून जोरदार निशाणा साधला जात आहे. यातच देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी एक संयुक्त निवेदन जारी करत देशातील जातीय हिंसाचाराच्या घटनांवर पंतप्रधान मोदी (PM Modi) गप्प का, असा गंभीर सवाल करत घणाघाती टीका केली. याला आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी प्रत्युत्तर दिले असून, देशातील जनतेच्या नावे एक खुले पत्र लिहिले आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेस काळातील दंगलींची यादीच देत देशातील तरुणांना विनाश नाही, विकास हवा आहे. विरोधकांनी आतापर्यंत भेदभाव आणि व्होट बँकेचे राजकारण केल्याचा आरोप करत, नड्डा यांनी विरोधकांनी आता विकासाचे राजकारण करावे, असा सल्ला दिला आहे. तसेच काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संसदीय निवडणुकीत पराभूत केले होते, याची आठवणही जेपी नड्डा यांनी देशवासीयांना लिहिलेल्या पत्रात करून दिली आहे. 

देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे होतील, तेव्हाचा भारत कसा हवा?

जेपी नड्डा यांनी देशाच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंत काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या दंगलींची यादीच दिली आहे. तसेच देशात काँग्रेसच्या कार्यकाळातच भीषण नरसंहार झाले, असा दावा नड्डा यांनी केला. तसेच देशाच्या स्वातंत्र्याला जेव्हा २०४७ मध्ये शंभर वर्षे होतील, तेव्हाचा भारत देशवासीयांना कसा हवा आहे, असा सवालही नड्डा यांनी केला आहे. आताच्या घडीला सर्व धर्मांतील, सर्व वयोगटातील युवापिढी सर्व क्षेत्रातील जनतेसह गरिबी हटवणे आणि भारताने नवीन यशोशिखर गाठण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नड्डा यांनी नमूद केले. 

दरम्यान, देशातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांत जातीय हिंसाचाराच्या घटना घडल्या असून चिथावणीखोर वक्तव्यांनी स्थिती आणखी बिघडवली जात आहे. त्यावर देशातील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी एक संयुक्त निवेदन जारी करत चिंता व्यक्त केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी , झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला, बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव , भाकपचे सरचिटणीस डी. राजा, देबब्रत बिस्वास, मनोज भट्टाचार्य, दीपांकर भट्टाचार्य, पी. के. कुन्हालीकुट्टी या १३ नेत्यांनी हे संयुक्त निवेदन जारी केले आहे. 

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण