शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

...तर लवकरच भारत भाजपामुक्त होईल; बड्या नेत्याकडून भाजपाला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 3:23 PM

मोदींचे सल्लागार त्यांना चुकीची माहिती देतात; भाजपा नेत्याचं शरसंधान

नवी दिल्ली: झारखंडमधील पराभवामुळे भाजपाच्या गोटात चिंतेचं वातावरण असताना पक्षाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामींनी घरचा आहेर दिला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था अतिशय वाईट आहे. आर्थिक आघाडीवर वेळीच योग्य पावलं उचलली न गेल्यास देश भाजपामुक्त होईल, असा इशारा स्वामींनी भाजपा नेतृत्त्वाला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सल्लागार त्यांना अंधारात ठेवत असल्याचंदेखील स्वामींनी म्हटलं आहे. 'अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न न केल्यास भारत भाजपामुक्त होईल. मोदींचे सल्लागार कोण आहेत याबद्दल मला माहिती नाही. मात्र ते त्यांना सत्य परिस्थिती सांगत नाहीत. मोदींना अंधारात ठेवण्याचं काम त्यांच्या सल्लागारांकडून सुरू आहे', अशा शब्दांत स्वामींनी स्वत:च्याच सरकारवर टीका केली. झारखंडमधील पराभवाच्या पार्श्वभूमीवर स्वामींनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. काल झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. राज्यात विधानसभेच्या एकूण ८१ जागा आहेत. यापैकी केवळ २५ जागा जिंकण्यात भाजपाला यश आल्यानं त्यांना सत्ता गमवावी लागली. तर झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलाच्या महाआघाडीनं ४७ जागा जिंकल्या. झारखंड मुक्ती मोर्चानं ३०, काँग्रेस १६, तर राष्ट्रीय जनता दलानं एक जागा जिंकली. झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन राज्याचे मुख्यमंत्री होतील. त्यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत दोन्ही ठिकाणी विजय संपादन केला आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJharkhandझारखंडBJPभाजपाSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी