शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

"गांधीजींची स्वातंत्र्य चळवळ हे निव्वळ नाटक; त्यांना महात्मा का म्हणायचे?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 06:16 IST

महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यसाठी केलेली चळवळ हे निव्वळ नाटक होते

बंगळुरू : महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यसाठी केलेली चळवळ हे निव्वळ नाटक होते, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे माजी केंद्रीय मंत्री व लोकसभा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केले. अशी नाटके करणाऱ्यांना महात्मा का म्हणायचे असा सवालही हेगडे यांनी केला आहे. या विधानामुळे देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर भाजपने त्यांना नोटीस पाठवून खुलासा करण्यास सांगितले आहे.

महात्मा गांधी यांच्याविषयी अनुदार उद्गार सहन केले जाणार नाही, असे भाजपच्या नेत्याने सांगितले. तो म्हणाला की, अनंतकुमार हेगडे याबद्दल स्वत:हून दिलगिरी व्यक्त करतील, अशी अपेक्षा आहे. मात्र भाजपने हेगडे यांच्या वक्तव्यावरजाहीर भूमिका मात्र घेतलेली नाही. कदाचित हेगडे यांनी माफी मागून प्रकरण मिटवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

एका जाहीर सभेत हेगडे म्हणाले की, स्वातंत्र्यची चळवळ ब्रिटिशांच्या पाठिंब्याने व संमतीने करण्यात आली होती. त्यावेळच्या कथित नेत्यांना ब्रिटिश पोलिसांच्या लाठीमाराचा प्रसाद मिळाल्याचे एकही उदाहरण नाही. या नेत्यांची चळवळ नाटकी होती. त्यांनी ब्रिटिशांशी खरा संघर्ष कधीच केला नाही. तडजोड करूनच चळवळ चालविली. महात्मा गांधी यांचे आमरण उपोषण व सत्याग्रह हेदेखील नाटकच होते.

जावडेकर म्हणाले, केजरीवाल हे अतिरेकी

अनंतकुमार हेगडे यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला असतानाच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तुलना अतिरेक्यांशी केली. ते म्हणाले की, केजरीवाल अराजकवादी आहेत. अराजकवादी व अतिरेकी यांच्यात काहीच फरक नसतो.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीBJPभाजपाAnantkumar Hegdeअनंतकुमार हेगडेcongressकाँग्रेसArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi electionदिल्ली निवडणूक