शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

भाजपा आमदाराच्या पजेरो कारने दुचाकीला उडविले; तिघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 14:19 IST

मृतांच्या नातेवाईकांनी आमदारच गाडी चालवत असल्याचा आरोप केला आहे.

बलदेवगड : खरगपूरचे भाजपाआमदार राहुल सिंह लोधी यांच्या पजेरो गाडीने बलदेवगड मार्गावरील पपावनी गावाजवळ मोटारसायकल स्वारांना उडविले. यामध्ये दोघेजण जागीच ठार तर तिसरा झाशीला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ही घटना घडली. याविरोधात संतप्त जमावाने टीकमगढ-बलदेवगढ रस्ता चार तासांसाठी रोखून धरला होता. 

राहुल सिंह लोधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी या जमावाने केली होती. मात्र, प्रशासनाने समजाविल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. राहुल सिंह हे माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांचे भाचे आहेत. पोलिसांनी आमदारावर 304 अ, 279/337 आणि 184 कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे. 

आमदार राहुल सिंह लोधी यांनी चालक वाहन चालवत होता. आपण वाहनामध्ये नव्हतो, असा दावा केला आहे. तर मृतांच्या नातेवाईकांनी आमदारच गाडी चालवत असल्याचा आरोप केला आहे. यावर लोधी यांनी गावातील लोक आपल्याला अडकविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. या घटनेशी माझा संबंध नाही. 

बृजेंद्र अहिरवार (28), रवि अहिरवार (27) आणि मदन अहिरवार (19) हे तिघे मोटारसायकलवरून टीकमगढहून बलदेवगढाकडे जात होते. यावेळी आमदाराच्या गाडीने त्यांना मागून धडक दिली. रवीचे काका अच्छेलाल यांनी आरोप केला आहे की आमदार राहुलच कार चालवत होते. 

यावर आमदार लोधी यांनी सांगितले की, मी फुटेरमध्ये होतो. कार्यक्रम संपल्यानंतर मी चालक विजय यादवला पजेरो घेऊन यायला सांगितले. चालकाने सांगितले की, घटनास्थळी दोन ऑटो आणि एक बाईक पडलेली होती. तसेच तीन जखमीही पडलेले होते. गर्दीतून वाट काढत चालक रेल्वे मार्ग पार करून फुटेरला पोहोचला आणि घटनेची माहिती दिली. 

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारAccidentअपघातUma Bhartiउमा भारती