शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
2
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
3
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
5
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
6
"मी ज्या झोपडपट्टीतून आलोय...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवची सणसणीत चपराक
7
गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील
8
'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू
9
'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल
10
Vastu Tips: पायपुसण्याखाली ठेवा कापराच्या दोन वड्या, होतील चमत्कारिक फायदे!
11
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
12
"किती दिवस स्वप्नीलसाठी फक्त टाळ्या वाजवायच्या?"; सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत
13
दुहेरी हत्याकांडाने छत्रपती संभाजीनगर हादरलं; दुचाकीच्या वादातून दोघांची दगडाने ठेचून हत्या
14
संतापजनक! ज्ञानाच्या मंदिरात शिक्षकानं विद्यार्थ्यांना पाजली दारू, पाहा व्हिडिओ
15
‘२.५ कोटी रुपये पगार असावा आणि...!’ भावी नवऱ्याकडून तरुणीच्या अपेक्षांची मोठी लिस्ट, व्हायरल पोस्ट चर्चेत
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
17
“...म्हणून त्यांनी माझे सरकार पाडले”; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, सांगितली Inside Story
18
हे साफ खोटं, ही FAKE NEWS आहे...; 'डिंपल गर्ल' प्रिती झिंटा असं का म्हणाली? प्रकरण काय
19
Astro Tips: 'या' उपायामुळे सोमवार २१ एप्रिलचा दिवस तुमच्या आयुष्यात संस्मरणीय ठरू शकतो!
20
३ तास समजावल्यानंतरही, सासूचे मत बदलले नाही, होणाऱ्या जावयाकडेच राहणार; मुलीच्या लग्नाआधी झाली होती फरार

उमा भारती करणार कुटुंबाचा त्याग, 'दीदी माँ' नावाने ओळखल्या जाणार; यामुळे घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 13:46 IST

मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या उमा भारती यांनी कुटुंबाचा त्याग करण्याची घोषणा केली आहे.

भोपाळ:मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या उमा भारती (Uma Bharti) यांनी कुटुंबाचा त्याग करण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी भारती यांनी जाहीर केले की, जैन संत आचार्य विद्यासागर महाराज यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी त्या आपल्या कुटुंबाचा त्याग करत आहेत. तसेच, त्या आता 'दीदी माँ' या नावाने ओळखल्या जाणार आहेत.

येत्या 17 नोव्हेंबर रोजी त्या गुरूच्या परवानगीने कुटुंबातील सदस्यांशी असलेले सर्व संबंध संपवणार आहेत. सलग 14 ट्विट करत उमा भारती यांनी ही घोषणा केली. आपल्या ट्विटमध्ये उमा भारती यांनी निवृत्तीचे संपूर्ण स्पष्टीकरण तर दिले आहेच, पण त्यांना फक्त 'दीदी माँ' या नावानेच का संबोधले जाईल हे देखील सांगितले आहे.

30 वर्षांपूर्वी घेतला होता संन्यास17 नोव्हेंबर 1992 रोजी त्यांनी अमरकंटकमध्ये 'संन्यास' घेतला होता, तेव्हा त्यांचे नाव उमा ऐवजी उमाश्री भारती करण्यात आले होते. या गोष्टीला 17 नोव्हेंबर 2022 रोजी 30 वर्षे होतील. उमा भारती म्हणाल्या की, गुरु विद्यासागर जी महाराज यांच्या सल्ल्यानुसार 30 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 17 नोव्हेंबरपासून त्या 'दीदी माँ' म्हणून ओळखल्या जातील. 

'आता तुम्हीच माझे कुटुंब आहात'उमा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, 'ज्या कुटुंबात माझा जन्म झाला...माझ्या राजकीय प्रवासात माझ्या भावांनी आणि पुतण्यांनी मला खूप साथ दिली. किंबहुना त्यांनी आपला जीव पणाला लावला, अनेक समस्यांना तोंड दिले. आता सर्वजण आपापल्या परीने प्रगती करत आहेत, मुली मोठ्या कॉलेजमध्ये आहेत. सून पायलट आहे, डॉक्टर आहे, वकील आहे…. हे कुटुंब माझे संपूर्ण जग आहे. पण आता एका कुटुंबाऐवजी तुम्ही सर्व माझे कुटुंब आहात… आता माझे कुटुंब देखील माझ्यापासून मुक्त आहे आणि मी देखील माझ्या कुटुंबापासून मुक्त होणार आहे.' 

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेश