शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

मोदींच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था मजबूत : भाजप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 17:44 IST

चालू वर्षातील पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपी ५ वर आला आहे. यानंतर मनमोहन सिंग यांनी चिंता व्यक्त करताना मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली होती. मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे हे झाल्याचा दावा त्यांनी केला होता. त्याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

नवी दिल्ली - देशाची अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक स्थितीत असल्याचा माजी पंतप्रधान आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांचा आरोप भारतीय जनता पक्षाने फेटाळून लावला आहे. तसेच मनमोहन सिंग यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात झालेला भ्रष्टाचार आणि राजकीय घराणेशाहीमुळे अर्थ व्यवस्थेला मोठा धक्का बसल्याचा आरोप भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात अर्थ व्यवस्थेला मजबूत आधार मिळाला आहे. तसेच जागतिक पातळीवर भारताची विश्वसार्हता वाढल्याचे पात्रा यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, मनमोहन सिंग माजी पंतप्रधान असून वयाने मोठे आहेत. परंतु, त्यांच्या १० वर्षांच्या कालखंडात भारताची ज्या प्रमाणात प्रगती व्हायला हवी होती, ती होऊ शकली नाही. मनमोहन सिंग अर्थतज्ज्ञ होते, परंतु, ज्या लोकांनी त्यांना पडद्यामागून निर्देश दिले ते लोक भ्रष्टाचारात अलिप्त होते. त्या लोकांमुळे घराणेशाहीला वाव मिळाला आणि अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले.

दरम्यान मोदींच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेला मजबूत आधार मिळाला असून जगात आपल्या अर्थव्यवस्थेची विश्वासार्हता वाढली आहे. भारताची अर्थव्यवस्था जागतीक पातळीवर पाचव्या स्थानी पोहोचली आहे. त्यातच अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी नुकत्याच केलेल्या घोषणांमुळे अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरेल, असा दावा पात्रा यांनी केला.

चालू वर्षातील पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपी ५ वर आला आहे. यानंतर मनमोहन सिंग यांनी चिंता व्यक्त करताना मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली होती. मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे हे झाल्याचा दावा त्यांनी केला होता. त्याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.