शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

मोदींच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था मजबूत : भाजप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 17:44 IST

चालू वर्षातील पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपी ५ वर आला आहे. यानंतर मनमोहन सिंग यांनी चिंता व्यक्त करताना मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली होती. मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे हे झाल्याचा दावा त्यांनी केला होता. त्याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

नवी दिल्ली - देशाची अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक स्थितीत असल्याचा माजी पंतप्रधान आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांचा आरोप भारतीय जनता पक्षाने फेटाळून लावला आहे. तसेच मनमोहन सिंग यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात झालेला भ्रष्टाचार आणि राजकीय घराणेशाहीमुळे अर्थ व्यवस्थेला मोठा धक्का बसल्याचा आरोप भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात अर्थ व्यवस्थेला मजबूत आधार मिळाला आहे. तसेच जागतिक पातळीवर भारताची विश्वसार्हता वाढल्याचे पात्रा यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, मनमोहन सिंग माजी पंतप्रधान असून वयाने मोठे आहेत. परंतु, त्यांच्या १० वर्षांच्या कालखंडात भारताची ज्या प्रमाणात प्रगती व्हायला हवी होती, ती होऊ शकली नाही. मनमोहन सिंग अर्थतज्ज्ञ होते, परंतु, ज्या लोकांनी त्यांना पडद्यामागून निर्देश दिले ते लोक भ्रष्टाचारात अलिप्त होते. त्या लोकांमुळे घराणेशाहीला वाव मिळाला आणि अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले.

दरम्यान मोदींच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेला मजबूत आधार मिळाला असून जगात आपल्या अर्थव्यवस्थेची विश्वासार्हता वाढली आहे. भारताची अर्थव्यवस्था जागतीक पातळीवर पाचव्या स्थानी पोहोचली आहे. त्यातच अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी नुकत्याच केलेल्या घोषणांमुळे अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरेल, असा दावा पात्रा यांनी केला.

चालू वर्षातील पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपी ५ वर आला आहे. यानंतर मनमोहन सिंग यांनी चिंता व्यक्त करताना मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली होती. मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे हे झाल्याचा दावा त्यांनी केला होता. त्याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.