शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

"मोदी तेरा कमल खिलेगा..."; खरी ठरली PM यांची भविष्यवाणी, त्रिपुरासह तीन राज्यांत मोठा फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 14:59 IST

पंतप्रधानांची ही भविष्यवाणी आता खरी ठरताना दिसत आहे...

मेघालयची राजधानी शिलाँग येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते, विरोधक 'मर जा मोदी-मर जा मोदी' म्हणत आहेत, पण जनता 'मोदी तेरा कमल खिलेगा', म्हणत आहे. पंतप्रधानांची ही भविष्यवाणी आता खरी ठरताना दिसत आहे. त्रिपुरामध्ये भाजप 32 जागांवर आघाडीवर असून पुन्हा एकदा सरकार स्थापन करताना दिसत आहे. याशिवाय नागालँडमध्येही भाजप 12 जागांवर आघाडीवर आहे, यांपैकी 2 जागा जिंकल्या आहेत. याच बरोबर मेघालयात सामना अडकला आहे. येथे एकूण 60 जागा आहेत. NPP जवळपास 24 जागांवर आघाडीवर आहे, हा आकडा बहुमतापेक्षा बराच दूर आहे. अशा स्थितीत एनपीपी भाजपसोबत 5 जागा आणि इतर काही जागांसह सरकार स्थापन करू शकते.

यापूर्वीही भाजप एनपीपी सरकारचा भाग होता. अशा प्रकारे या तिन्ही राज्यांमध्ये भाजपचा सत्तेत वाटा असेल. मतांचा विचार करता, यातही भाजपची स्थिती अत्यंत चांगली आहे. एकेकाळी भाजप ईशान्येकडील राज्यांमध्ये सर्वात कमकुवत पक्ष समजला जात होता. याळेवी भाजपला त्रिपुरामध्ये 39 टक्के मते मिळाली आहेत. नागालँडमध्येही 18 टक्के लोकांनी भाजपला पसंती दिली आहे. याशिवाय मेघालयातही 8 टक्के मते भाजपच्या खात्यात जात आहेत. मेघालयात टीएमसीलाही 5 जागा मिळू शकतात. पण त्यांना सत्तेपासून दूरच रहावे लागेल. दरम्यान, एनपीपीचे कोनराड संगमा आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यात बैठक झाल्याचे वृत्त आहे. अशा स्थितीत दोघे मिळून सरकार स्थापन करू शकतात.

भाजपसाठी त्रिपुराचा विजय हा सर्वात महत्त्वाचा असेल. 2018 मध्ये सत्तेवर आलेल्या भाजपला, यापूर्वी येथे तुरळकच यश मिळायचे. पण गेल्या 5 वर्षांपूर्वी भाजपने येथे पहिल्यांदाच सरकार स्थापन केले. अशा स्थितीत येथे पुन्हा एकदा सत्तेवर येणे भाजपसाठी मोठी गोष्ट आहे. बंगाली आणि आदिवासी समाज मोठ्या संख्येने असलेल्या त्रिपुरामध्ये भाजपचा विजय देशभरासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषत: आदिवासीबहुल भागात भाजपला याचा फायदा होऊ शकतो. आदिवासींची लोकसंख्या १ कोटीहून अधिक असलेल्या मध्य प्रदेशात याच वर्षी निवडणुका होत आहेत. येथे भाजप त्रिपुराच्या विजयाचा उल्लेख करून आदिवासी मतांना आपल्याकडे आर्षित करू शकते.

टॅग्स :ElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाTripuraत्रिपुरा