शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

झारखंडमधील भाजपचा पराभव नितीश कुमार यांना सुखावणारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 12:28 PM

झारखंडमधील पराभवानंतर भाजपने आपल्या मागण्या मान्य कराव्या, अशी इच्छा नितीश यांची आहे.

नवी दिल्ली - झारखंडमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला. मात्र भाजपच्या या पराभवामुळे बिहारचे मुख्यमंत्री आणि भाजपचे मित्र असलेले नितीश कुमार आनंदी होणार असल्याचे चित्र आहे. बिहारमध्ये सत्तेत असूनही नितीश यांच्यासाठी भाजपचा झारखंडमधील पराभव सुखावणारा आहे. 

झारखंडमधील पराभवामुळे यापुढे भाजप आपल्या मित्रपक्षांसोबत सामोचराने घेईल, असं त्यांना वाटत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्षांना योग्य तो सन्मान भाजपकडून देण्यात आला नाही. भाजपला एकट्याच्या बळावर देशात बहुमत मिळाल्याने हे झाल्याचा मतप्रवाह आहे. त्यावेळी नितीश यांनी केंद्रात महत्त्वाचे मंत्रीपद मागितले होते. त्यांची ही मागणी भाजप अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुडकावून लावली होती. तसेच पटना येथील विश्वविद्यालयाला केंद्रीय विश्वविद्यालय बनविण्याची नितीश यांची मागणी फेटाळून लावली होती. 

दरम्यान झारखंडमधील पराभवानंतर भाजपने आपल्या मागण्या मान्य कराव्या, अशी इच्छा नितीश यांची आहे. झारखंडमध्ये भाजपचा पराभव होण्याचे अनेक कारणं आहेत. पाच वर्षांपूर्वी भाजपकडून झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी गैरआदिवासी असलेले रघुबर दास यांना बसविण्यात आले होते. त्यावेळी विरोधात असलेल्या नितीश यांनी भाजपच्या या निर्णयाला विरोध केला होता. तसेच आदिवासींच्या राज्यात हा आदिवासींवर अन्याय असल्याचे म्हटले होते.