शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

'एनआरसीवरून भाजपने दहशत निर्माण केली'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 2:43 AM

६ बळी गेल्याचा ममतांचा दावा; मूल्यांना सुरुंग लावल्याचा आरोप

कोलकाता : नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्सवरून (एनआरसी) भाजपने दहशत निर्माण केल्याचा आरोप सोमवारी करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एनआरसीमुळे राज्यात सहा जणांचा बळी गेल्याचा दावा केला. कामगार संघटनांच्या येथील बैठकीत बोलताना बॅनर्जी यांनी आम्ही राज्यात एनआरसी लागू होऊ देणार नाही.बंगालमध्ये किंवा देशात कुठेही एनआरसी अंमलात येणार नाही. आसाममध्ये त्याची अंमलबजावणी झाली ती आसाम करारामुळे, असे त्या म्हणाल्या. १९८५ मध्ये राजीव गांधी यांचे सरकार आणि आॅल आसाम स्टुडंटस् युनियन यांच्यात ‘आसाम करार’ झाला होता.बांगला देशातून बेकायदेशीरपणे येऊन आसाममध्ये राहणाऱ्या स्थलांतरितांविरुद्ध सहा वर्षे चाललेले आंदोलन या करारामुळे संपले होते.पश्चिम बंगालमध्ये एनआरसीवरून दहशत निर्माण करणाºया भारतीय जनता पक्षाचा धिक्कार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा मी राज्यात एनआरसी लागू करू देणार नाही, असे बॅनर्जी तपशील न देता म्हणाल्या.आसाममध्ये नुकतीच एनआरसीची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यातून १९ लाख लोकांची नावे वगळण्यात आली आहेत. एनआरसीत नाव असणे हा भारतीय नागरिक असल्याचा पुरावा आहे. देशात भाजप लोकशाही मूल्यांना सुरुंग लावत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला.सरकारी मालकीच्या उपक्रमांचे खासगीकरण आणि ते बंद करण्याच्या निषेधार्थ देशभर १८ आॅक्टोबर रोजी मोर्चे निघणार आहेत आणि मी त्यात सहभागी होणार आहे, असे बॅनर्जी यांनी सांगितले. १९ सप्टेंबर रोजी जादवपूर विद्यापीठात जे काही झाले त्याचा संदर्भ देऊन बॅनर्जी म्हणाल्या की, अभाविप आणि भाजपने विद्यापीठात काय केले हे संपूर्ण बंगालने पाहिले आहे.भाजपला राजकीय हिताची चिंता‘पश्चिम बंगालमध्ये लोकशाही अस्तित्वात आहे. परंतु देशाच्या अनेक भागांत तिला धोका निर्माण झाला आहे. भाजप नोकºया, रोजगार बुडाल्याबद्दल, देशाची अर्थव्यवस्था घसरत असल्याबद्दल काही बोलत नाही. त्याला फक्त त्याच्या राजकीय हिताची चिंता आहे,’ असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा