शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

'एनआरसीवरून भाजपने दहशत निर्माण केली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 02:44 IST

६ बळी गेल्याचा ममतांचा दावा; मूल्यांना सुरुंग लावल्याचा आरोप

कोलकाता : नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्सवरून (एनआरसी) भाजपने दहशत निर्माण केल्याचा आरोप सोमवारी करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एनआरसीमुळे राज्यात सहा जणांचा बळी गेल्याचा दावा केला. कामगार संघटनांच्या येथील बैठकीत बोलताना बॅनर्जी यांनी आम्ही राज्यात एनआरसी लागू होऊ देणार नाही.बंगालमध्ये किंवा देशात कुठेही एनआरसी अंमलात येणार नाही. आसाममध्ये त्याची अंमलबजावणी झाली ती आसाम करारामुळे, असे त्या म्हणाल्या. १९८५ मध्ये राजीव गांधी यांचे सरकार आणि आॅल आसाम स्टुडंटस् युनियन यांच्यात ‘आसाम करार’ झाला होता.बांगला देशातून बेकायदेशीरपणे येऊन आसाममध्ये राहणाऱ्या स्थलांतरितांविरुद्ध सहा वर्षे चाललेले आंदोलन या करारामुळे संपले होते.पश्चिम बंगालमध्ये एनआरसीवरून दहशत निर्माण करणाºया भारतीय जनता पक्षाचा धिक्कार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा मी राज्यात एनआरसी लागू करू देणार नाही, असे बॅनर्जी तपशील न देता म्हणाल्या.आसाममध्ये नुकतीच एनआरसीची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यातून १९ लाख लोकांची नावे वगळण्यात आली आहेत. एनआरसीत नाव असणे हा भारतीय नागरिक असल्याचा पुरावा आहे. देशात भाजप लोकशाही मूल्यांना सुरुंग लावत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला.सरकारी मालकीच्या उपक्रमांचे खासगीकरण आणि ते बंद करण्याच्या निषेधार्थ देशभर १८ आॅक्टोबर रोजी मोर्चे निघणार आहेत आणि मी त्यात सहभागी होणार आहे, असे बॅनर्जी यांनी सांगितले. १९ सप्टेंबर रोजी जादवपूर विद्यापीठात जे काही झाले त्याचा संदर्भ देऊन बॅनर्जी म्हणाल्या की, अभाविप आणि भाजपने विद्यापीठात काय केले हे संपूर्ण बंगालने पाहिले आहे.भाजपला राजकीय हिताची चिंता‘पश्चिम बंगालमध्ये लोकशाही अस्तित्वात आहे. परंतु देशाच्या अनेक भागांत तिला धोका निर्माण झाला आहे. भाजप नोकºया, रोजगार बुडाल्याबद्दल, देशाची अर्थव्यवस्था घसरत असल्याबद्दल काही बोलत नाही. त्याला फक्त त्याच्या राजकीय हिताची चिंता आहे,’ असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा